मलकापूर शिवारात तळवटाच्या चो-या तर सकाळी फिरायला जाणाऱ्या महिलांना अडवून लूटमार

तेरणा काठ न्युज
कळंब तालुक्यातील मलकापूर शिवारातील पावसामुळे सोयाबीन बुचाडावर झाकलेल्या तळवटाची भुरट्या चोऱ्या होत आहेत
याबाबत माहिती अशी की, दिनांक ६/१० /२०२४ च्या पहाटे तळवट चोरी गेल्याचे सदर मलकापूर येथील शेतकरी रामहारी विश्वनाथ लोमटे यानी शेतामधील सोयाबीन पीक काढले व पाऊस पडत असल्याने त्याचे बुचाड लावून तळवटाने झाकले, पहाटे ते शेतात गेले असता त्यांना बुचाड उघडं असल्याचे दिसून येताच बचाडावरील तळवट चोरी गेल्याचे निदर्शनास आले त्यांच्यासोबतच जयसिंग लोमटे, बालाजी शिवाजी लोमटे, हानुमंत काकडे यांच्याही बुचाडावरचे तळवटाच्या चो-या झाल्या आहेत, पाऊस पडल्यामुळे सोयाबीनचे बुचाड भिजले असून प्रत्येकाचे २० ते २५ हजार रुपये पर्यंत नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. सोयाबीनच्या बुचडा वरील तळवट चोरी जात असल्याने शेतकरी घाबरले असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा चोरांची जोरात वाढ होत असतानाच मंगळवार दि. ८/१०/२०२४ येथील दोन महीला Morning walk करण्यासाठी सकाळी ५-ते ५.३० दरम्यान हायवे रोडवरून जात असताना अज्ञात दोन तरूण मोटार सायकल वरुन येऊन धारदार शस्त्राचा धाक दाखवून कानातील साखळया व मंगळसूत्र घेऊन पसार झाले अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने गस्त करणारे पोलीस नेमकं करतात काय याबाबत संशय निर्माण झाली आहे.
सध्या येडेश्वरी देवी नवरात्र महोत्सव साजरा होत असताना अनेक जण रात्री अपरात्री कार्यक्रम निमित्ताने बाहेर पडताना दिसत आहेत त्यातही महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर असतो तरी वरिष्ठांनी याबाबत लक्ष देऊन अशा भुरट्या चोऱ्यांना आळा घालावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातून होताना दिसत आहे