ताज्या घडामोडी

ज्ञानोद्योग विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याकडून दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

तेरणा काठ वृत्तसेवा –-येरमाळा येथील ज्ञानद्योग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 2004 च्या दहावी बॅचचे माजी विद्यार्थी व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम भालेराव , एम एस बी अर्बन पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने  2024- 25 च्या दहावी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करत गुणगौरव करण्यात आला.

या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञान प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आबासाहेब बारकुल होते. पोलीस निरीक्षक संग्राम भालेराव, माजी मुख्याध्यापक डी आर बारकुल मुख्याध्यापक एस.एल. पौळ , पर्यवेक्षक सुनील पाटील, बालाजी बारकुल, संदीप देशमुख, तेजस बारकुल, मुन्ना मोरे, अजय बेद्रे, संदीप बारकुल, सुनील भालेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी  दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक आलेल्या सानवी सुखदेव बारकुल या विद्यार्थिनीला रोख पाच हजार रुपये व कॉलेज सॅक, तसेच 90% च्या पुढे मार्क घेणाऱ्या एकूण बारा विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1000 रुपये व कॉलेज सॅक देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजक बालाजी बारकुल यांनी प्रास्ताविकात बोलताना सांगितले की, 2004 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गावात 100 केशर आंब्याची झाडे वाटप केले तसेच गावातील जिल्हा परिषद कन्या शाळेला माजी विद्यार्थ्यांन तर्फे ग्रीन बोर्ड व मार्कर बोर्ड व आता हा गुणवंत विद्यार्थ्यांच्या आर्थिक स्वरूपात रोख बक्षीस व कॉलेज सॅक देऊन सत्काराचा कार्यक्रम ही याच माध्यमातून होत असून असे सामाजिक उपक्रम ही बॅच राबवत असल्याचे सांगितले. तसेच येरमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम भालेराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व अशा कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते म्हणून आयोजकांचे कौतुक केले यावेळी माजी मुख्याध्यापक डी आर बारकुल यांनी गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माझी एक महिन्याची पेन्शन देण्याचे जाहीर केले, तसेच जनहित पतसंस्थेचे संतोष तौर यांनी पुढील वर्षी प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाच हजार, तीन हजार व दोन हजार रुपये बक्षीस देण्याचे जाहीर केले, व एम एस बी अर्बन चे बालाजी बारकुल यांनी प्रत्येक वर्षी 90% च्या पुढील विद्यार्थ्यांना कॉलेज सॅक देण्याचे जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे सर यांनी केले तर शेवटी आभार बालाजी बारकुल यांनी मानले. कार्यक्रमास शाळेतील पाचवी ते दहावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.