ताज्या घडामोडी
जनहीत ग्रा बी. शेती सहकारी पतसंस्थेकडून जनहीत कृषी भवन परिसरात वृक्षारोपण

तेरणा काठ वृत्तसेवा — यंदाच्या पावसाळ्यात पन्नास लक्ष वृक्षांची लागवड करण्याचा महत्वकांक्षी उपक्रमांतर्गत हरित धाराशिव अभियान जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले असून जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, संस्था यांना यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत येरमाळा येथील जनहीत ग्रा बी शेती सहकारी पतसंस्थेकडून जनहीत कृषी भवन येथे छत्रपती संभाजीनगरचे तहसीलदार डॉ शिवानंद बिडवे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी संस्थापक,अध्यक्ष संतोष तौर व्हा. चेअरमन नितिन कवडे, एस बी आयचे कृषी कर्ज सल्लागार ऋषीकेश उकीरडे , निशांत कांबळे, जिवन जाधव ,शहाजी पवार, फारूक पठाण यांच्यासह पतसंस्थांचे सर्व संचालक , कर्मचारी उपस्थित होते