धनगरांना एस टी आरक्षण लवकरच–डॉ रामकृष्ण लोंढे

धाराशिव (शहर प्रतिनिधी) :- अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच च्या पदाधिकारी मंडळींची बैठक श्री संत एकनाथ सभागृह, बिबवेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून जवळपास २६० पदाधिकारी / कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रबोधन मंच चे प्रमुख श्री मधू शिंदे ( निवृत्त आय पी एस अधिकारी) हे अध्यक्ष स्थानी होते तर आमदार श्री गोपीचंद पडळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात अहिल्यादेवी प्रतिभा पूजणाने करण्यात आली. यावेळी श्री शिंदे साहेबांनी धनगर एस टी आरक्षण न्यायालयीन लढाई संदर्भात सविस्तर माहिती दिली. विविध जिल्ह्यातून आलेल्या समाज बांधवांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन शंका समाधान केले. यावेळी प्रबोधन मंच चे संचालक डॉ रामकृष्ण लोंढे (कळंब जि धाराशिव) यांनी आरक्षण मिळविण्यासाठी न्यायालयीन लढाई बरोबर रस्त्यारील जन आंदोलन चालू ठेऊन जनरेटा निर्माण केला पाहिजे असे नमूद केले. यामुळे शासनावर दबाव निर्माण होऊन आरक्षण प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला जाऊ शकतो. गेले ७५ वर्षे आरक्षणाचा मुद्दा राज्यकर्ते नी लोंबकळत ठेवला असुन त्यावर कोणतीच ठोस उपाययोजना केलेली नाही हे आपले दुर्दैव असल्याचे त्यांनी नमूद केले. म्हणून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी न्यायालयीन लढाई बरोबर रस्त्यावरील लढाई चालू ठेवून जनरेठा निर्माण कला पाहिजे. त्याबरोबरच जाती जनगणना करु जनगणनेनुसार वंचितांना आरक्षण दिले पाहिजे.
यावेळी धाराशिवचे जिल्हाध्यक्ष प्रा सोमनाथ लांडगे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाची आकडेवारी काढण्यासाठी गाव पातळीवर *जनगणना* केली पाहिजे हे सुचवले. यावेळी त्यांनी एका गुगल फॉर्म वर ती माहिती कशी संकलित होऊ शकते हे सांगितले. या माध्यमातून येत्या दोन महिन्यात संपूर्ण माहिती उपलब्ध करून ती मंचाकडे सुपुर्द केली जाईल असे सांगितले.
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षण साठी विविध पातळीवर जी काही मदत लागेल ती देण्यासाठी मी कटीबद्ध आहे. मी प्रथम धनगर असुन नंतर पार्टीचा कार्यकर्ता असल्याचे म्हटले.
यावेळी धनगर आरक्षणाचे याचिकाकर्ते ईश्वर ठोंबरे, मंच चे महासचिव डॉ जय प्रकाश बघेल, सचिव इंजी सुधाकर शेळके यांनी मार्गदर्शन केले. काळे , अशोक शेजाळ यांनी जमलेल्या समाज प्रतिनिधी साठी उत्तम व्यवस्था केली होती.