ताज्या घडामोडी

कळंब तहसीलदार यांना लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन

तेरणा काठ वृत्तसेवा — कळंब येथे दि.२० जुन रोजी लोक जनशक्ती पार्टी च्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ थेट कर्ज योजनेचे अर्ज तात्काळ निकाली काढण्यात यावेत,
नवीन शिधापत्रिका धारकांना तात्काळ धान्य उपलब्ध करावे,
श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी यांचे मानधन गेल्या पाच ते सहा महिन्यापासून मिळालेले नाही ते तात्काळ लाभार्थ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात येऊन त्यांची उपासमार थांबवावी,
समाज कल्याण विभागाचा निधी इतरत्र कोणत्याही योजने करता वापरू नये,
महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण महामंडळ अंतर्गत बांधकाम मजूर यांची सदस्यत्व नोंदणी विना विलंब करण्यात यावी, आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.सदरील मागण्या पूर्ण न झाल्यास तहसील कार्यालयाच्या आवारात लोकशाही मार्गाने दि. २७ जुन २०२५ रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी
लोकजनशक्ती पार्टी चे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ गायकवाड,मानव अधिकार आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत पाटुळे,मुकेश गायकवाड, दीपक हौसलमल,निवृत्ती हौसलमल, गौतम हजारे, बजरंग धावारे,नटराज गायकवाड, विशाल शिंदे, महावीर गायकवाड, श्रीकांत हूलसूलकर,सतीश चंदनशिवे,भारत कदम, नागेश धीरे,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.