खामसवाडी येथे डेंग्यू व चिकनगुणीया आजारांनी नागरिक त्रस्त

जयनारायण दरक—-कळंब
कळंब (प्रतिनिधी)कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे गेल्या पंधरा दिवसांपासून थंडी,ताप, अंगदुखी, सर्दी, खोकला,या सारख्या आजाराने नागरीक त्रस्त आहेत.त्यामुळे आरोग्य विभागाने तात्काळ उपाययोजना राबवुण घरोघरी भेटी देऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना ग्रामपंचायत सदस्य विश्वास कोकणे यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,खामसवाडी गावांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून डेंग्यू,चिकनगुनिया, सर्दी, खोकला, अंगदुखी या सारख्या आजाराने नागरीक त्रस्त झाले आहेत.डॉक्टरांकडे गेल्यास अशी लक्षणं आढळुन येत आहेत.तर या मध्ये शालेय विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश आहे.गावामध्ये डासांची संख्या वाढत असल्याने धुरळणी करुण घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.सदरील निवेदनावर आरोग्य विभागाने तात्काळ उपाययोजना राबवावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य विश्वास कोकणे यांनी केली आहे.