कळंब येथे पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न

कळंब…. /जयनारायण दरक
पत्रकारांची प्रतिमा बदलत चालली आहे, तळागाळातील ग्रामीण भागातील आवाज आज पत्रकारितेच्या माध्यमातून राजधानी पर्यंत पोहचला जात आहे ,असे प्रतिपादन पत्रकार नम्रता वागळे यांनी पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी व्यक्त केले.
कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने बुधवार (ता.१०) जानेवारी रोजी पत्रकार पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाला. या वेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्व.शिवशंकर बाप्पा घोंगडे, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी, बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन, व दिप्प्रवजलन करण्यात आले. व्यासपीठावर राजकीय विश्लेषक अभय देशपांडे, प्रा.डॉ.अशोक मोहेकर, कवी, पत्रकार रवी केसकर, पुढारी न्यूज चया नम्रता वागळे यांची उपस्थिती होती.
अभय देशपांडे आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, चांगल्या पत्रकारांचा सन्मान करणे हा कळंब तालुका पत्रकार संघाचा उत्कृष्ठ उपक्रम आहे. , पत्रकारितेची आत्मशैली अवगत करताना पत्रकारांनी आपली मुळ नाडी न सोडता त्याच्याशी प्रामाणिक राहावे.
तर साहित्यिक
रवी केसकर यांनी आपल्या भाषणात , ग्रामीण भागातील पत्रकारिता ही संवेदनशील असते, नैतिक भान ठेऊन आत्मीयतेने सर्व समस्या सोडवत जबाबदारीने कार्य करीत आहेत
कळंब तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार वितरण सोहळ्याचे पंचविसावे वर्ष आहे. या वेळी
कै. शि.म.ज्ञानदेव मोहेकर राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार – आफताब शेख (सोलापूर), कै. शिवशंकर घोंगडे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – अतुल कुलकर्णी बीड), कै. रा.ई. काकडे ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार – मुस्ताब मिर्झा (संपादक – कळंब), कै.गणेश घोगरे पत्रकारिता पुरस्कार – बालाजी आडसुळ (कळंब), स्व. शकुंतला देशपांडे स्मृती समाजसेवा पुरस्कार – निलेश मोहीते (स्नेह सावली फाउंडेशन बीड), के. सुधाकर सावळे साप्ताहिक पत्रकारीता पुरस्कार – गिरीष जव्हेरी (संपादक सा. युगप्रवर्तक), कै. के. ए. जोशी आदर्श शिक्षक पुरस्कार – अब्दुल माजीद काली ( जिल्हा परीषद शाळा मस्स्सा( खं.) व विशेष सम्मान गुणगौरव पुरस्कार – गणेश शिंदे (जेष्ठ पत्रकार तथा संपादक दै. लोकहित)यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी उपजिल्हा रुग्णालय व पत्रकार संघाच्या वतीने रक्त चाचण्या, मधुमेह आदी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी पत्रकार यांच्या सोबत दोनशे जणांनी लाभ घेतला.
या वेळी शहरातील, ग्रामीण भागातील पत्रकार, विविध पक्षातील पदाधिकारी, संघटनेचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने आश्रुबा कोठावळे यांचा पुस्तका चे प्रकाशन, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, पुस्तक संकलन मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला.. ग्रामीण रुग्णालय मार्फत रक्त, हिमोग्लोबिन, थायरॉईड आदी विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या या कार्यक्रमाचे.सूत्रसंचलन प्रा.जगदीश गवळी यांनी तर सतीश टोणगे यांनी आभार मानले.