मलकापूर येथे भाजपचे “गाव चलो” अभियान संपन्न

भारतीय जनता पार्टीच्या वतीने ४ ते ११ फेब्रुवारी या काळात धाराशिव जिल्ह्यात ‘गाव चलो अभियान’ राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार राणाजगजीतसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, घरचलो अभियान चे जिल्हा संयोजक मिलिंद पाटील, कळंब पं .स चे माजी सभापती विकास बारकुल यांच्या मार्गदर्शनाखाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘गाव चलो अभियान’ या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टी येरमाळाच्या वतीने मलकापूर येथे ‘गाव चलो अभियान’ राबविण्यात आले. देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आल्यापासुन सामान्य नागरिकांच्या हिताचे, लोककल्याणकारी योजना राबविण्यास सुरुवात केली. त्यामध्ये प्रधानमंत्री सन्मान निधी योजना,प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना,आयुष्यमान भारत कार्ड योजना,किसान क्रेडिट कार्ड योजना,जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान,हर घर जल योजना अशा अनेक योजना राबवून कोरोना काळात मोफत धान्य वाटप करण्यात आले अश्या मोदी सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्व गावागावांत पोहोचवण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. एकही नागरिक योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी ‘गाव चलो अभियान’ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते,नेते,लोकप्रतिनिधी यांच्याकडून राबविले जात आहे. याप्रसंगी जि .प सदस्य मदन बारकुल, बंडु नाना बारकुल, बप्पा बारकुल, महेश बारकुल, सतिष काका लोमटे, नरसिंग लोमटे, दत्तात्रय लोमटे, समाधान मते, अशोक लोमटे, किरण लोमटे, विजय वणवे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.