मी फोनवर चिल्लर कामे केली असली ती लोकांच्या अडीअडचणीला मदत करणारीच — ओमराजे निंबाळकर

मी जरी खासदार म्हणून लोकांची चिल्लर कामे केली असली तरी ती लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी होती यापूर्वी अनेक जण खासदार होऊन गेले जे निवडून गेले ते पुन्हा लोकांच्या अडीअडचणीला परत आले नाहीत मी कायम लोकांमध्ये राहिलो माझी नाळ मी जनतेशी कायम ठेवली विरोधकांना हेच पटत नाही त्या गोष्टीची चेष्टा केली जाते परंतु हीच जनता माझ्या पाठीशी आहे असे उद्गगार ओमराजे निंबाळकर यांनी येरमाळा येथील प्रचार सभेत बोलले
लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात येरमाळा येथे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांची प्रचार सभा झाली यावेळी संजय पाटील दुधगावकर तालुकाप्रमुख शिवाजी आप्पा कापसे, प्रतापसिंह पाटील, सुनील पाटील, विभागप्रमुख राहुल पाटील, अनिल तात्या पवार, समाधान बेद्रे, लहू बारकुल, शरद बारकुल, रमेश पवार,नितीन बारकुल, मुन्ना मोरे यांच्यासह गावातील परिसरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना ओम राजे निंबाळकर मिळाले की, नरेंद्र मोदी हे अत्यंत खोटारडे पंतप्रधान असून त्यांनी आतापर्यंत दिलेला कुठलाही शब्द पाळला नाही केवळ गप्पा मारणे व लोकांच्या भावनांची खेळणे या पलीकडे त्यांनी काय केले नाही खासदार काय असतो यावरती भाष्य करताना मी लोकांची कामे करणे याला महत्त्व देतो मग ती साधी असो कि भारी हे माझ्यासाठी गौन आहे .सर्वसामान्य लोकांची खासदारांनी करायची नसतात का?असा सवालही ही त्यांनी उपस्थित केला, विरोधी उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्यावरही सडकून टीका केली
यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन बालाजी बारकुल यांनी केले.