ताज्या घडामोडी

खामसवाडी येथे मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा

जयनारायण दरक/कळंब

कळंब (प्रतिनिधी) कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने येथील साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चौकामध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.या वेळी मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या वेळी भिमशाहिर राजेंद्र कांबळे यांनी त्रिशरण व पंचशिल बुद्ध वंदना घेऊन सर्वांनी अभिवादन केले.या वेळी मानवहित लोकशाही पक्षाचे कळंब तालुका अध्यक्ष धनंजय भाऊ ताटे,छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील,ग्रा.पं.सदस्य प्रभाकर शेळके,प्रा.संजय राजमाने, शाखाध्यक्ष महावीर पाटुळे, बाळासाहेब पाटुळे, जगदिश पाटुळे, भिमराव कांबळे, चंद्रसेन सावंत,शिलवंत कांबळे, बळीराम सावंत,सावता माळी,शंकर लोंढे, संतोष पाटुळे,अनिल पाटुळे, शिवाजी चांदणे यांच्या सह समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.