ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा चोर ओमराजेला मतदारांनी त्याची जागा दाखवून द्यावी — प्रा.डाॅ, तानाजीराव सावंत

जयनारायण दरक/ कळंब

धाराशिवकरांची लक्ष्मी म्हणून ओळखला जाणाऱ्या ढोकी येथील तेरणा साखर कारखाना भंगार करून विक्री करणाऱ्या, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा चोर ओमराजेला मतदारांनी त्याची जागा दाखवून द्यावी, अशी टीका कळंब तालुक्यातील मोहा येथील महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना तानाजीराव सावंत यांनी केले.

यावेळी बोलताना सावंत म्हणाले की, ओमराजेंनी एक कोटी रुपयांचे कारखान्याचे साहित्य भंगारात विकले. लवकरच तेरणा कारखान्याचे साहित्य भंगारात विकत घेतलेल्या भंगार खरेदीदार जनतेसमोर पुरावे सादर करणार आहे. ओमराजेनी तेरणा साखर कारखाना लातूरच्या देशमुखांच्या घशात घालण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र आम्ही त्यांना यश येऊ दिले नाही. तसेच डिसीसी बॅंकेचे वाटोळेही खासदारांच्या पित्याने केले. असाही आरोप यावेळी सावंत यांनी केला. तसेच धाराशिव जिल्ह्यात उजणी धरणाचे पाणी डिसेंबर २०२४ पर्यंत येणारच आहे. सध्या या कामावर महायुती सरकारने १६ हजार ५०० कोटी रुपये निधी टाकला असून हे काम नव्वद टक्के पूर्ण झाले आहे. उजणीच्या पाण्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले जाणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब, वाशी, भूम, परंडा, तुळजापूर, उमरगा, लोहारा आणि धाराशिव या आठही तालुक्यात हे पाणी शेतीसाठी बारमाही मिळणार आहे. उजणीच्या पाण्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती बहरली जाणार आहे. धाराशिवचा मागासपणाचा शिक्का पुसून टाकण्यासाठी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या घड्याळाला मत द्यावे. असे आवाहन यावेळी सावंत यांनी केले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.