दिल्ली येथे राष्ट्रीय संमेलनात भाई बजरंग ताटे यांनी दलित आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केली मांडणी

मानव अधिकार रक्षक राष्ट्रीय संमेलन इंडियन सोशल इन्स्टिट्यूट लोधी रोड नवी, दिल्ली येथे दि.१०ते१२फेब्रुवारी२०२४ रोजी ॲक्शन एड संस्थेच्या वतीने पार पडले.या मानव अधिकार रक्षक राष्ट्रीय संमेलनामध्ये महाराष्ट्र,हिमाचल,भोपाळ, पंजाब,उत्तर प्रदेश, हरियाणा, इत्यादी राज्यातील ५०० मानव अधिकार रक्षक, संघटना, संस्था, कार्यकर्ते , उपस्थित होते. महाराष्ट्र उस्मानाबाद जिल्ह्यातून मानव अधिकार रक्षक, श्रमिक मानवाधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकहित सामाजिक विकास संस्थेचे सचिव,काॅ.भाई बजरंग ताटे यांची ॲक्शन एड मुंबई या संस्थेच्या वतीने निवड करण्यात आली होती. या वेळी श्रमिक मानवाधिकार संघ व लोकहित सामाजिक विकास संस्थेच्या वतीने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये १०० गावांचा सर्व्हे, जनतेचा जाहीरनामा,जनतेची मागणी पत्र, या कार्यक्रमांतर्गत पारधी,आदिवासी, दलित, शेतकरी जनतेच्या प्रश्नाचे संशोधन करून दि.१० ते१२ फेब्रुवारी २०२४ रोजी इंडियन सोशल लोधी रोड नवी,दिल्ली येथे मानव अधिकार रक्षक,राष्ट्रीय संमेलनात उस्मानाबाद जिल्ह्यातील सोळा हजार कुटुंब व महाराष्ट्रातील 65 हजार कुटुंब सरकारी गायरान व वन जमिनीवरील शेती प्रयोजनासाठी झालेली अतिक्रमणे यांचा कायदा करून गायरान धारकांच्या नावे करण्यात यावीत, उस्मानाबाद जिल्ह्यातील ३७ हजार कुटुंब , महाराष्ट्रातील ७६ हजार कुटुंबे निवासी प्रयोजनासाठी झालेली अतिक्रमणे नावे करून ५ लाख रुपये घरकुल योजनेसाठी अनुदान देऊन आहे त्या ठिकाणी घरकुले बांधून देण्यात यावीत, संविधानातील उद्देश न्याय,स्वातंत्र्य,समता, बंधुत्व,या उद्देशावर पारधी, आदिवासी, दलित,शेतकरी यांच्या मुद्द्यावर उद्देशिका प्रमाणे महाराष्ट्र शासन ,केंद्र सरकार यांच्याकडून न्याय मिळत नाही. गरिबी मुक्त गाव नाही, मूलभूत सेवा उदाहरणार्थ स्वच्छ पाणी,निवारा नाही,शेतीविषयक दर्जेदार बियाणे व जैविक खते माहिती तंत्रज्ञानाचा अभाव,गरीब कुटुंबे तसेच कौशल्य विकासाच्या हेतूने उत्सुक व्यक्तीची नोंदणी होत नाही, शोषण करणाऱ्या अटीवर दिलेले कर्ज, उधारी बंद नाही, सामाजिक सुरक्षिततेचे कार्यक्रम महागाई निदर्शनाच्या निदर्शक प्रमाणे प्रभावी नाहीत , सर्व वयोगटातील सर्वांचे जीवन निरोगी आणि आरोग्यदायी नाही, मुले स्त्रिया यांच्यातील कुपोषण वाढत आहे , पाच वर्षाखालील मुला-मुलींना पौष्टिक आहार नाही, मुलींच्या विवाहाच्या आणि गरोदरपणाच्या वयाबाबत वस्ती ,गावात ,जनजागृती नाही ,मलेरिया तसेच पाण्याने उद्धभावणारे विविध रोगाचे नियमन करण्यासाठी स्वच्छतेची प्रभावी देखरेख नाही ,लिंग आधारित गर्भपात होणार नाहीत यावर देखरेख करण्यासाठी प्रभावी यंत्रणा नाही ,कौटुंबिक हिंसा होणार नाही यासाठी प्रभावी उपाययोजना नाहीत, अपंगत्वाचे निदान आणि व्यवस्थापन नाही , बालमजुरी बंद नाही, गुन्हेगार होऊ नये म्हणून पारधी आदिवासी दलित यांच्या मुलासाठी प्रभावी , शिक्षण, पोलीस ,यंत्रणा काम करत नाही ,सार्वजनिक पिण्याच्या स्त्रोतचे गुणवत्ता परीक्षण होत नाही, पारधी आदिवासी वस्तीवर पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणाची सोय नाही म्हणून गुन्हेगारी चे प्रमाण वाढत आहे, पारधी आदिवासी वस्त्या मुख्य रस्त्याला जोडल्या गेल्या नाहीत, हवामान बदलामुळे शेतकऱ्यांची नुकसान होते त्यासाठी प्रभावी मदत नाही, भिकारी केले जाते, बेरोजगारी वाढल्यामुळे मुला मुलींचे विवाह होत नाहीत अशा प्रश्नांची वास्तवाची मांडणी श्रमिक मानवाधिकार संघ संस्थापक अध्यक्ष, लोकहित सामाजिक विकास संस्थेचे ,सचिव काॅ.भाई बजरंग ताटे यांनी दिल्लीच्या मानव अधिकार रक्षक , राष्ट्रीय संमेलनामध्ये जनतेचा जाहीरनामा , जनतेचे मागणी पत्र द्वारे आलेल्या प्रश्नांची वास्तव मांडणी केली. मांडणी केलेल्या वास्तव प्रश्नाची , जनतेचा जाहीरनामा जनतेचे मागणी पत्र, भारत देशातील ,महाराष्ट्रातील पक्षप्रमुख आकडे जनतेचा, जाहीरनामा ,व जनतेचे मागणी पत्र, पोहोच करून वास्तव मांडणार आहेत.