चिंचोलीमाळीचे भूमिपुत्र तथा राज्याचे अन्न आयोगाचे अध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांचा भव्य सत्कार संपन्न
बैलगाडीतून काढली भव्य मिरवणूक

तेरणा काठ न्युज
अखिल भारतीय समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष ॲड. सुभाष (भाऊ) राऊत यांची राज्य अन्न आयोगाच्या अध्यक्षपदी (राज्यमंत्री दर्जा) निवड झाल्याबद्दल चिंचोलीमाळी या त्यांच्या मूळ गावी भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. सत्कार समारंभ पूर्वी बैलगाडीतून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढून जेसीबीतून फुलांचा वर्षाव, फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य दिव्य नागरी सत्कार आज चिंचोली माळी येथे करण्यात आला आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांना आयुष्यातील पांडुरंग मानत समता परिषदेच्या बीड जिल्हा अध्यक्षपदापासून भुजबळ साहेबां सोबत एकनिष्ठ राहून स्वतःच्या संसाराची राख रांगोळी झाली तरी मी माझ्या पांडुरंगाची साथ सोडणार नाही अशी कायम भूमिका घेणाऱ्या ॲड. सुभाष राऊत यांना त्यांच्या कष्टाचे आणि त्यागाचे फळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगनरावजी भुजबळ साहेब, माजी खासदार समीर भाऊ भुजबळ माजी आमदार पंकज भाऊ भुजबळ यांच्या माध्यमातून मिळाले आहे. याबद्दल केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे भव्य नागरी सत्कार करण्यात येऊन अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगनरावजी भुजबळ साहेबांचे चिंचोली माळी ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहेत.