ना गावच्या फलकाची सोय, ना निवाऱ्याची सोय; रणरणत्या उन्हात प्रवाशांची गैरसोय

—- कळंब ते येरमाळा राष्ट्रीय महामार्गावरील कन्हेरवाडी येथिल पाटिवर प्रवाशांना पिण्यासाठी पाणी व वाढत्या उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून कुठलाही निवारा नसल्याने प्रवाशांची या रणरणत्या उन्हात मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे मात्र गेल्या कित्येक वर्षापासून आमदार खासदार व राजकारणी नेत्यांनी आजपर्यंत प्रवासाच्या सोयीसाठी निवारा व गावच्या नावाचा फलक करु शकले नाहीत असा आरोप प्रवासी व ग्रामस्थांमधून होत आहे कोणतीही निवडणूक आली की जनतेला खुश करण्यासाठी फक्त आश्वासनाची खैरात केली जाते या पाटिवर कुठल्याही प्रकारचा निवारा व गावच्या नावाचा फलक नाही गेल्या पाच सहा वर्षांपासून कधी पाऊस तर कधी कडक ऊन आणि थंडी अशा परिस्थितीमध्ये प्रवाशांचे हाल हाल होताना दिसून येत आहेत दररोज सकाळी सात वाजता महाविद्यालयीन तरुण-तरुणी गावापासून दोन किलोमीटर पायपीट करत जात असतात या गावात पाच ते सहा वर्षांपासून परिवहन महामंडळाची बस नव्हती पण या दोन-तीन दिवसात कन्हेरवाडीचे सरपंच ॲड. रामराजे जाधव यांनी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन कळंब आगार प्रमुख यांना दिला होता याचा पाठपुरावा बालाजी माणिक कवडे यांनी सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून केल्यामुळे लेडीज क्लबच्या अध्यक्ष सौ. अर्चनाताई पाटील यांनी परिवहन महामंडळ धाराशिवच्या वरिष्ठ अधिकारी यांना चर्चा करून गुरुवार दिनांक 30 मे पासून कळंब ते वाशी कन्हेरवाडी मार्गे दिवसातून चार ते पाच फेऱ्या करत असल्यामुळे ग्रामस्थांमधून व महाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे तसेच ज्या प्रवाशांना कन्हेरवाडी पाटीच माहित नाही असे प्रवासी व वाहनधारक कळंब कडून आले तर चक्क मस्सा गावापर्यंत जातात व तिथे विचारपूस करून परत येतात आणि येरमाळ्याकडून आले तर चक्क आंदोरा या गावापर्यंत जातात तिथे विचारपूस करून परत येतात असे दिसून येत आहे म्हणून प्रवासी व वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत आहे अशी कन्हेरवाडी पाटीची दूरदशा आहे तरी आमदार खासदार यांच्यासह गावातील राजकीय नेत्यांनी तात्काळ प्रवासी शेड निवारा व गावच्या नावाचा फलक लावण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा करून व निवेदन देऊन प्रवासी निवारा व गावच्या नावाचा फलक लावावा अशी मागणी ग्रामस्थ, महाविद्यालयीन तरुण-तरुणी व प्रवाशांमधून होत आहे.