ताज्या घडामोडी
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

तेरणा काठ वृत्तसेवा
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर 1956.रोजी महापरिनिर्वाण झाले.महापरिनिर्वाण दिन म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांचा स्मृती दिन साजरा केला जातो. म्हणून येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृतीला पुतळ्याला पुष्प वाहून विविध राजकीय पक्ष संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी कळंबचे-वाशी माजी आमदार,दयानंद गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत,लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड, भाजपा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सतपाल बनसोडे,सचिन गायकवाड,दिलीप कसबे, शहाजी शिकलकर मुकेश गायकवाड, महादेव ओव्हाळ, प्रकाश धावरे, आदिच्या उपस्थितीमध्ये महामानवास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले