धाराशिव कळंब मतदार संघासह बार्शीतही अर्चनाताई पाटील यांची अंतिम टप्प्यात सरशी :: प्रचाराच्या तोफा थंडावल्या.

तेरणाकाठ /धाराशिव
लोकसभा निवडणुक अवघ्या दोन दिवसावर आली असुन महायुतीच्या राष्ट्रवादी (अ.प.गट ) उमेदवार सौ.अर्चनाताई राणाजगजीतसिहं पाटिल यांनी धाराशिव,कळंब बार्शी मतदार संघातून प्रचारात आता सरशी घेतली आहे.
धाराशिव लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार सौ. अर्चनाताई पाटील यांची उमेदवारी घोषित होण्यासाठी वेळ लागला होता.त्या तुलनेत महाविकास आघाडीचे उमेदवार माजी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची उमेदवारी घोषित झाली होती त्यांनी प्रचारात आघाडीही घेतली होती.त्या तुलनेत जिल्ह्यातील महायुतीच्या घटक पक्षातील शिवसेना (बा.ठा.गट) राष्ट्रवादी पक्षात उमेदवारीतून नाराज गट प्रचाराच्या रिंगणात उतरायला वेळ लागला.राष्ट्रवादीचे सुरेश बिराजदार तर पालकमंत्री प्रा.तानाजी सावंत व त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांची नाराजी दूर करण्यात आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना यश आले असुन महायुतीच्या या दोन्ही पक्षाचे पदाधिकारी अर्चनाताई पाटील यांच्या प्राचाराला लागले असुन या निवडणुकीत प्रचारात आघाडी घेत. प्रचारात आघाडी घेतलेल्या उबाठा शिवसेनेचे उमदेवार ओमप्रकाश राजेनिबाळकर यांच्या विरुद्ध प्रचारातून आज पर्यंत केलेली विकास कामे काय सांगा,तेरणा साखर कारखान्याचे भंगार विकले असे म्हणतं विविध आरोप करत चंगलीच दमछाक केल्याने प्रचारात चांगलीच रंगत आलेली दिसत आहे. गेल्या कांही दिवसांपूर्वी एकतर्फी वाटणाऱ्या यानिवडणुकीत अर्चनाताई पाटील यांनी प्रचारात मुसंडी घेतल्याने चुरस निर्माण झाली आहे.
३० तारखेला धाराशिव येथे महायुतीच्या उमेदवार सौ. अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा झाली.या सभेत त्यांनी अर्चनाताईंना मत म्हणजे मोदीला मत असल्याचे सांगत आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्चनाताईंना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन धाराशिव जिल्ह्यातील मतदारांना केले. यामुळे एकजूटीने अर्चनाताईच्या विजयासाठी कामाला लागलेल्या महायुतीच्या लोकप्रतिनिधी,पदाधिकारी यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले असुन स्थानिक विधानसभा धाराशिव कळंब मतदार संघसह बार्शी मतदार सांगतही प्रचारात सरशी घेतल्याचे चित्र दिसत आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची हवा असलेल्या कळंब धाराशिव,बार्शी विधानसभा मतदार संघात सरशी घेतल्याचे चित्र दिसत आहे.
महाविकास आघाडीच्या तुलनेत लोकसभा मतदार संघ महायुतीसाठी तुल्यबळ तगडे आहे.
भूम,परांडा,वाशीचे पालक मंत्री आमदार प्रा.तानाजी सावंत त्यांचे पुतणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, विधानपरिषदेचे आमदार सुरजीतसिंह ठाकूर,आमदार विक्रम काळे,उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले,माजी खासदार रवी गायकवाड,माजी आमदर बसवराज पाटील,तुळजापूरचे आमदार राणाजगाजितसिंह पाटील,औस्याचे आमदार अभिमन्यू पवार,उदगीरचे आमदार माजी मंत्री सुनील बनसोडे,बार्शीचे आमदार राजभाऊ राऊत,त्याचे बंधू विजय राऊत,कृ.उ.बा.समितीचे चेअरमन रणवीर राऊत,यांच्या सह आप आपल्या मतदार संघात मताधिक्य देनारे स्थनिक पदाधिकारी जिल्हा प्रमुख सूरज साळुंके माजी शहर प्रमुख संजय मुंडे,भाजपचे कळंब तालुकाध्यक्ष अजित पिंगळे,भाजपाचे संजय गाढवे.शिवसेना महिला आघाडीच्या अर्चना दराडे,भाजपा जिल्हाउपाध्यक्ष माजी पं.स.सभापती विकास बारकुल,मदन बारकुल,दत्ता साळुंके,उपसभापती भगवान ओव्हाळ,राष्ट्रवादीचे जिल्हाउपाध्यक्ष प्रवीण यादव,असा तगडा लवाजमा महायुतीच्या आमदार सौ. अर्चनाताई पाटील यांना निवडून आनण्यासाठी डोअर टू डोअर जाऊन अर्चनाताई पाटील विरोधी उमेदवाराच्या तुलनेत कशा चांगल्या आहेत हे पटवून देत आहेत.त्यामुळे त्यांनी आता निवडून येण्याच्या दिशेने अंतिम टप्पा गाठल्याने चित्र स्पष्ट दिसत आहे.