स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य व विचार पुढील पिढीला माहित होणे गरजेचे- ह.भ.प.चारुदत्त बुवा आफळे

कळंब/जयनारायण दरक
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारक कार्य व ऐतिहासिक लेखन यामधून प्रेरणा निर्माण केली आहे ती मोलाचे आहे त्यांच्या कार्याचा विषय पुढील पिढीला कळला पाहिजेत देशसेवेची संधी १०० जन्माच्या शोधा नंतर मिळते असे विचार प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त बुवा आफळे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर किर्तन सेवा करीत असताना व्यक्त केले कळंब युवक आघाडी व स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 29 फेब्रुवारी रोजी विठ्ठल मंदिर कळंब येथे आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी निमित्त दोन दिवस किर्तन सेवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ,याप्रसंगी चारुदत्त बुवा आफळे यांनी कीर्तनात सावरकर यांची जीवनगाथा उलगडून सांगितली सावरकर विज्ञाननिष्ठ होते सांगत असताना अध्यात्म व विज्ञान दोन्हीचाही अंगीकार होण्याची गरज प्रतिपादन केली सा 1857 च्या उठावात या देशभक्त क्रांतिकारकांनी योगदान दिले आहे त्यांची इंग्लंड मध्ये टिंगल ,टवाळी केली जायची याविषयीची तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्यांच्या डायरीतून माहिती घेऊन या विषयावर पुस्तक लिहिले याचा परिणाम देशभक्ताची इंग्लंडमधील टिंगल टवाळी थांबली असे सांगून अंदमान निकोबार येथील सश्रम करावास, हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून बजावलेली भूमिका समतेसाठी सहभोजन पंगत व त्यांची दूरदृष्टी विचार याविषयी सखोल मार्गदर्शन केले त्यांनी याप्रसंगी ने मज परत मातृभूमी सागरा प्राण तळमळला हे सावरकरांचे गीत व हा प्रसंग श्रोत्यांसमोर उभा केला कार्यक्रमाचे प्रास्ताविकात कळंब युवक आघाडीचे अध्यक्ष यशवंत दशरथ यांनी कळंब युवक आघाडीची स्थापना 18 फेब्रुवारी 1974 रोजी झाली हे वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे यातील हा पहिला कार्यक्रम असल्याचे सांगितले, दिनांक 28 फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली दीपप्रज्वलन चारुदत्त बुवा आफळे, डॉ. रामकृष्ण लोंढे, शहाजी पाटील श्रीमती सुमन जोशी, प्रतिभा बावीकर वसुधा कुलकर्णी यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत जगदीश गोरे ,अनिल कुलकर्णी, विलास खांडेकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मकरंद पाटील, संदीप बावीकर ,जगदीश गोरे ,अनिल कुलकर्णी ,श्रीकांत जोशी ,विलास खांडेकर ,ऋषिकेश दशरथ, , विश्वनाथ हुलसुलकर, मच्छिंद्र साखरे यांनी परिश्रम घेतले.