अंगणवाडी भरती प्रक्रिया मध्ये घोटाळा संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून सेवेतून निलंबित करा! रिपाई (खरात) गटाची मागणी

प्रतिनिधी-: महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने डिकसळ ता.कळंब जि.धाराशिव येथे सन 2023-2024 मध्ये अंगणवाडी (मदतनीस) या पदाची भरती करण्यात आली. ही भरती करत असताना गुणवत्तेला डावलून भ्रष्ट मार्गाने आर्थिक व्यवहार करून संबंधित निवड समितीमधील अधिकारी व कर्मचारी यांनी कमी टक्केवारी (परसेंटीज) असणाऱ्या उमेदवारांची भरती केली आहे.तरी निवड समितीमधील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून सेवेतून निलंबित करण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प कळंब यांच्याकडे एकूण 21 उमेदवारांनी अर्ज केले होते.या पैकी पाच उमेदवाराचे अर्ज अपात्र झाले असून 16 उमेदवार पात्र होते.
16 पैकी तीन उमेदवाना 70% गुण आहेत.68%.63%.प्रत्येकी एक.57%.दोन,55%पाच,50% तीन.तर एक 45 %असे एकूण 16 उमेदवार पात्र होते.
पात्र यादीतील अनुक्रमांक एक ते चार हे उमेदवार गुणवत्तेनुसार पात्र होते. तर पात्र यादीतील अनुक्रमांक पाच मधील उमेदवार हा 63% चा होता म्हणजे कमी परसेंटेज असे
असताना70%च्या उमेदवाराला डावलून 63% च्या उमेदवाराला अंगणवाडी मदतनीस या पदाची नियुक्ती देऊन भरती करण्यात आली आहे.निवड समितीला जे गुण देण्याचे अधिकार होते ते संपूर्ण गुण पात्र यादी मधील अनुक्रमांक पाच या उमेदवाराला दिल्याचे दिसून येते
याप्रकरणी गुणवत्तेला डाउनलून भ्रष्ट मार्गाने आर्थिक व्यवहार करून भरती करण्यात आली आहे असे वाटते. मौजे डिक्सळ येथील अंगणवाडी (मदतनीस) भरती प्रकरणांमध्ये झालेल्या भ्रष्ट गैर कारभाराची चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे व सदर देण्यात आलेली नियुक्ती रद्द करून गुणवत्तेनुसार नियुक्ती देण्यात यावी या प्रकरणी योग्य ती कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी निवेदनात दिला आहे.