६०० वर बस फेऱ्या असणाऱ्या कळंब बस स्थानकात एकच वाहतूक नियंत्रक उचलतोय सगळा भार

कळंब/ जयनारायण दरक
“साहेब, अमुक अमुक गावाला जायला बस कधी आहे हो?”; तितक्यात एखाद्या बस ची एन्ट्री करण्यासाठी चालकाचा लॉगशीट ची नोंद करण्यासाठी खिडकीत हात येतो तर बऱ्याच वेळा बस ची चौकशी करण्यासाठी फोन येत असतो…अशा अनेक कामे पाहणारा एकच वाहतूक नियंत्रक कळंब बस स्थानकावर असतात, त्यामुळे एकाच वेळी कोणाचे समाधान करावे असा प्रश्र्न त्यांना निर्माण होतो.
कळंब बस स्थानक हे एक जिल्ह्यातील प्रमुख बस स्थानकापैकी एक आहे. या ठिकाणाहून विदर्भ ते पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा एक शॉर्टकट असा मार्ग आहे त्यामुळे या स्थानकावर प्रवाशांची रेलचेल तसेच बसेस ची आवक जावक मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय लोकल च्या बस फेऱ्यांची पण संख्या मुबलक आहे. जसे की कळंब – केज, धाराशिव, बार्शी, लातूर या मार्गावर सतत बसेस धावत असतात. त्याच्या नोंदी करणे, शिवाय बाहेरगावाहून येणाऱ्या बसेस च्या नोंदी करणे व लागलीच त्यांचे ऑनलाईन माहिती भरून पुकारणे हे पण तितकेच महत्वाचे आहे, जेणेकरून वाट पाहत बसलेल्या प्रवाशांना बसेस ची कल्पना मिळेल.
तितक्यात अनेक प्रवाशी वाहतूक कक्षाच्या खिडकिमध्ये बसेस ची चौकशी करण्यासाठी तोबा गर्दी केलेली असते. त्यांच्या समाधाना सारखी उत्तरे देणे तितकेच निकडीचे असते. याशिवाय एखादा फोन ची रिंग आल्यावर तो फोन कोणाचा का असेना तो पण घेणे महत्वाचे असते. कारण चौकशी कक्षात कांहीं जन फोन वर बसेस ची चौकशी करत असतात. नाही उचलावा तर फोन घेत नाहीत म्हणून वारिष्ठकडे तक्रारी केल्या जातात.
त्यामुळे अशी सर्व कामे केवळ फक्त एकाच वाहतूक नियंत्रक यांना करावे लागत असल्याने कित्येकवेळा ते पण वैतागून जातात. ‘खाजगी वाहने बस स्थानकात रेलचेल वाढली ‘ या स्थानकाच्या आवारात खाजगी वाहने याकडे लक्ष देत असतील तर त्यांना बाहेर काढण्यासाठी लाऊड स्पीकर च्याद्वारे सूचना करण्याचे काम सुद्धा वाहतूक नियंत्रक यानाच करावे लागते. नाही ऐकले तर त्याच्यावर कारीवाही करावी लागते.
त्यामुळे कळंब बस स्थानकाच्या वाहतूक नियंत्रक कक्षाच्या ठिकाणी किमान सकाळी ते संध्याकाळ पर्यंत दोघांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. सध्या हे सर्व कामे फक्त एकजनच करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. साहजिकच वरीलपैकी एखादा उपभोक्ता वाहतूक नियंत्रक यांच्या प्रती उत्तरपसून वंचित राहतो. त्यामुळे या ठिकाणी दोन कर्मचारी यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे असे प्रवाशा मधून कुजबुज असते. वाहतूक नियंत्रक यांच्या नियुक्त्या ह्या विभागीय कार्यालयामार्फत असल्याने वरिष्ठांनी याचा विचार करणे गरजेचे आहे.