भोगवटादार नंबर दोन(7/12) वरील नोंद कमी करून भोगवटदार नंबर एक ला नोंद घेण्याची मागणी.. शेतकऱ्यांची मागणी!

!
मौ घारगाव ता परंडा जिल्हा धाराशिव (उस्मानाबाद) येथील सन. 4 फेब्रुवारी 1954 मध्ये श्री.लक्ष्मण बलभीम लटके रा.(घारगाव) यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कै.ऍड.माजी आमदार वासुदेव उर्फ नानासाहेब आनंदराव (देशमुख) रा कसबे परंडा,यांच्याकडून वडीलो पार्जित वहीवाटाची मूळ सर्वे नंबर त्या काळातील 27,28, मधील एकूण 44 एकर जमीन खरेदी करून घेतली आहे. त्या जमिनीची जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्याकडून नजर चुकीने भोगवटादार नं 2ला लागलेली नोंद कमी करून भोगवटादार नं 1ला घेण्याची मागणी जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे रिपाई (खरात) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे यावेळी निवेदनात म्हटले आहे की,सदर जमीन खरेदीसाठी जिल्हाधिकारी धाराशिव उस्मानाबाद यांची दिनांक 19/01/1954 रोजी जा क्र. 22 च्या पत्रांनी परवानगी घेतलेली आहे तसेच खरेदी खतातील पान नंबर (3)तीन मध्ये मा जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिल्याचे स्पष्ट नमूद केले आहे.ही जमीन खरेदी केल्यानंतर या जमिनीचे मालक लक्ष्मण बलभीम लटके हे तेव्हापासून होते सदर जमीन खरेदी केल्यामुळे इनामी /देवस्थान /सिलिंग /बक्षीस/दान ची नसल्यामुळे सन 1954 ते 2022 पर्यंत भोगवटादार नं 1 (एक) ला नोंद होती. शासनाकडून देण्यात आलेल्या जमिनी संदर्भात कायदा केल्यानंतर या जमिनी शासनाच्या परस्पर विकता येऊ नयेत्त म्हणून भोगवटादार नं 1 (एक) वरून नं 2 (दोन)ला नोंद घेण्यात आल्या त्यामध्ये सर्वे नंबर 27,28 मधील जमिनीची नोंद शासनाकडून म्हणजे तात्कालीन जिल्हाधिकारी यांच्याकडून नजर चुकीने भोगवटादार नंबर 1 ऐवजी नंबर 2 (दोन) ला नोंद घेण्यात आली. लक्ष्मण बलभीम लटके यांच्यानंतर त्यांच्या वारसा हक्काने कुटुंब वाढत गेल्याने एकूण 14 जणांचे आजचे सर्वे नंबर. 71, 72, 73, 74 ,75, 76,77, 78 असे आहेत. या सर्वांचे भोगवटादार नंबर 1 ला एक नोंद घेण्यात यावी.
जाणून बुजून या जमिनीची नंबर 2( दोन)ला नोंद घेणारे शासनाचे तात्कालीन जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी याप्रकरणी न्याय नाही मिळाला तर आम्ही आपल्या कारल्यासमोर आमरण उपोषण करू असा इशारा येथील शेतकऱ्यांनी निवेदनात दिला आहे
निवेदनावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, भीमराव लटके, पांडुरंग लटके, बाजीराव लटके श्रीमंत लटके, केशव लटके, नंदू लटके, गौतम लटके ,विजय लटके, अमित लटके, मुरलीधर लटके, सर्जेराव लटके, जालिंदर लटके, नवनाथ लटके, संजय लटके आदींच्या स्वाक्षरी आहेत