जिल्हा बँकेस गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाने विविध उपाययोजना केल्या सुरू

जिल्हा बँक आर्थिक अडचणीत असून जिल्हा बँकेस गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाने विविध उपाय योजना सुरू केलेल्या असून त्याच कामाचा एक भाग म्हणून जिल्हा लेवलवर दक्षता पथकाची निर्मिती केली आहे. या दक्षता पथकाने नाबार्ड वर रिझर्व बँकेने नमूद केलेल्या निर्देशावर आपल्या कामाची व्याप्ती जिल्हा भर वाढवून बँक पूर्ववत होण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना त्याचे महत्त्व पटवून देणे, जिल्हा बँकेचे काउंटर चालू करणे, जिल्हा बँकेची थकबाकी वसुली करणे, थकित सभासदाविरुद्ध 101 प्रकरणांची कार्यवाही करण्यास लावणे, केवायसी ची पूर्तता करणे, आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे जिल्हा बँकेचे भाग भांडवल वाढविण्यासाठी प्रयत्न करणे या मार्गाचा अवलंब केला असून त्या दृष्टीने दक्षता पथकाचे कामकाज अगदी जोमाने चालू असल्याचे पहावयास मिळते. याच कामाच्या निमित्ताने दक्षता पथकाचा आज कळंब तालुक्यातील येरमाळा येथे जिल्हा बँकेच्या कार्यक्षेत्रात भाग भांडवल वाढीसाठी कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी दक्षता पथकाने उपस्थित ग्रामस्थ व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे काही पदाधिकारी यांच्या समवेत चर्चा करून जिल्हा बँक आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. त तसेच या गावांमध्ये काही सहकारी संस्थांची स्थापना झालेली असल्यास अशा सहकारी संस्थांना प्रवाहामध्ये आणण्यासाठी बँकेने नव्याने सभासद करून घेण्याचे ठरविले आहे व त्याच धर्तीवर वैयक्तिकरित्या सभासदांना ही सभासद करून घेण्याची भूमिका अंगीकारलेली असल्याचे यावेळी नमूद केले सुरुवातीस.उपस्थित सदस्यांनी विविध विषयावर वादविवाद निर्माण केलेले होते त्याचे पथकाने चर्चात्मकरित्या निराकरण करून बँकेचे चेअरमन श्री बापूराव पाटील व त्यांचे संचालक मंडळ सध्या वरिष्ठ पातळीवर मदत मिळवण्यासाठी प्रयत्नशील असून लवकरच बँकेस थक हमीची रक्कम मिळण्याची शक्यता आहे असे दक्षता पथकाने यावेळी उपस्थित सदस्यांना सांगितले. तसेच थक हमीची रक्कम प्राप्त झाल्यानंतर या रकमेतून बँक काही अंशी जुन्या ठेवीदाराची रक्कम देण्यासाठी व उत्पन्न वाढ विषयक कर्ज वाटपासाठी विनियोग करणार आहे. मात्र आता नव्याने बँकेचे काऊंटर चालू करा व यानंतर मिळालेल्या ठेवीची रक्कम मागता क्षणी परत देण्यास बँक जबाबदार राहणार असून तसे संबंधित शाखा अधिकारी यांना बँकेचे कार्यकारी संचालक यांनी आदेशित केलेले आहे असे या ठिकाणी सर्वांना अवगत केले. तसेच जिल्हा बँकेची शेतकऱ्याकडे असलेली थकबाकी वेळेत भरून बँकेस सहकार्य करावे अशीही विनंती यावेळी करण्यात आली. सर्व मुद्देनिहाय चर्चा झाल्यानंतर शेवटी वैयक्तिक सभासद करण्याची विनंती केल्यानंतर येरमाळा येथील जवळपास 21 वैयक्तिक सभासदांनी प्रत्येकी रुपये पाच हजार /100 याप्रमाणे एकूण रुपये एक लाख 5 हजार 100 इतक्या रकमेची भाग भांडवल रूपाने जिल्हा बँकेस सहकार्य करून सभासदाचा प्रस्ताव व रक्कम येरमाळा शाखेत जमा केलेली आहे. यावेळी विविध गावातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाच्या शेवटी दक्षता पथकाचे प्रमुख श्री टी एम कपाळे व त्यांचे सहकारी यांनी उपस्थित त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. तर येरमाळ्याचे शाखाधिकारी श्री बालाजी जाधवर व कळम ची ज्येष्ठ तपासणीस श्री बारगुळे यांचेही यावेळी मोलाचे सहकार्य लाभले.