तुळजापूर शहरातील बस स्थानकाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे!

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हे तीर्थस्थान (तुळजापूर) प्रसिद्ध असं शहर आहे.या ठिकाणी महाराष्ट्रासह इतर राज्यातून भाविक दर्शन घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात येतात.भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकारकडून या ठिकाणी मोठे बसस्थानक व्हावे म्हणून नवीन बसस्थानकाच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली.पूर्वीचे जुने बस स्थानक पाडून या ठिकाणी नवीन बस स्थानकाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे.हे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. म्हणून निक्रेष्ठ दर्जेचे काम करणारे अधिकारी व गुत्तेदार यांच्यावर योग्य किती कडक कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे
यावेळी निवेदनात म्हटले आहे की,पाया भरणीचे खोदकाम करताना काढण्यात आलेली माती बाजूला टाकण्यात आली होती तीच माती बेसमेंट केल्यानंतर मधले रिकामे रान भरून घेण्यासाठी वापरली आहे.त्या ठिकाणी मुरमाचा वापर करणे गरजेचे होते.सदरचे काम लेंटल लेवल पर्यंत केले आहे या बांधकामावर आवश्यकतेनुसार पाणी मारण्यात आलेले नाही.बसस्थानकाचे काम डस्ट मध्ये केले आहे हे बांधकाम करताना अंदाजपत्रकात ठरवून दिलेले जे ॲटम आहेत त्या ॲटम प्रमाणे करावयाचे आहे पण त्याप्रमाणे करण्यात आलेले नाही.
प्रवाशांच्या निवाऱ्यासाठी चांगल्या क्वालिटीचे काम करून घेण्यात यावे जेणेकरून ते काम दीर्घकाळ टिकेलं जर असे नाही झाले तर जनतेचे कोट्यावधी रुपये वाया जातील
तरी मे.साहेबांना विनंती आहे की,सदर प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून बसस्थानकाचे निकृष्ट दर्जाचे करण्यात आलेल्या कामाची चौकशी करून संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांच्यावर तात्काळ योग्य ती कडक कारवाई करून बस स्थानकाचे काम अंदाजपत्रकातील नियमानुसार करण्यात यावे. निकृष्ट दर्जेचे काम करणारे अधिकारी व गुत्तेदर यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी दिला आहे.