दोस्ती ग्रुप चे गेट टुगेदर उत्साहात संपन्न

———–/कळंब/जयनारायण दरक—- ———————–
कळंब येथे “आई राधा उदो उदो ..”च्या गजरात सुरू झालेल्या दिवसभराचा गेट-टुगेदर चा समारोप मात्र,” चलते चलते मेरे गीत याद रखना कभी अलविदा ना कहना…” या गीताने झाला दहावीतील मित्र-मैत्रिणींनी दिवसभर जुन्या आठवणींना उजाळा देत मौज मजा केली. कोरोना नंतरचे दोस्ती तुटायची नाय…ग्रुपचे पहिलेच गेट टुगेदर तर ग्रुप स्थापन झाल्यापासूनचे तिसरे स्नेहसंमेलन धमाल मस्ती, जुन्या आठवणीने, पार पडले.या वेळी वर्ष भर राबवण्यात येणाऱ्या सामाजिक कामाचे ठराव मांडण्यात आले, याला सर्वांनी संमती दिली. कळंब येथील दहावी मध्ये 1987 साली शिकत असलेल्या मित्र-मैत्रिणीने दोस्ती तुटायची नाय हा ग्रुप स्थापन केला आणि या ग्रुपने मराठवाड्यात वेगळी ओळख निर्माण केली या ग्रुपमध्ये राज्य व राज्याबाहेर विखुरले आहेत.या ग्रुपमध्ये 80 सदस्य आहेत मैत्रीचे नाते निभावताना या ग्रुपने समाज भांन राखत ग्रुप स्थापन झाल्यापासून अनेक सामाजिक काम केल्याने पुरस्कारही मिळाले या ग्रुपनेच या भागात गेट-टुगेदरची संकल्पना पुढे आणल्याने आता अनेक जण गेट-टुगेदर घेऊ लागले आहेत. या ग्रुपचे हे तिसरे स्नेहसंमेलन अगदी आनंदात व उत्साहात पार पडले स्नेहसंमेलनाच्या सुरुवातीस येणाऱ्या प्रत्येक कुटुंबाचे उत्साहाने गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. सकाळी दहा ते पाच या वेळेत मनोरंजन, गायन, मनोगत, यासारखे अनेक कार्यक्रम घेण्यात आली. बबन चव्हाण यांच्या गोंधळी गीताने गेट-टुगेदरची गेट-टुगेदर ची सुरुवात झाली आई राजा उदो उदो च्या जयघोषित सुरू झालेल्या कार्यक्रमाची रंगत हळूहळू वाढत गेली सुरुवातीस, बापू क्षीरसागर , सुनील बांगर, अशोक कळसकर, कान्होबा तूपसागर , राजेंद्र पाटील यांच्या हस्ते दिप प्रज्वलन केल्यानंतर गणपतीची आराधना करण्यात आली ज्ञान अज्ञात यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली गायक सुरेश शेप यांनी दिवसभर मात्र सर्वांनाच आपल्या गायनाने खिळवून ठेवले तर सौ.आर्चना संदीप बावकर यांनी बहारदार असे सूत्रसंचालन केले. आपल्या सुरेल आवाजात डॉ. रुपेश कवडे , सौ. धनश्री कवडे, संजय घुले, यांनी मैत्रीबद्दलचे गायन केले तर मनोगतांमध्ये सौ .उन्मुखं पारवे -शिरसागर, बाळासाहेब धस, सुबोध सुरवसे ,अशोक चोंदे ,डॉ. आकांक्षा विकास यादव यांनी ग्रुप बद्दल मनोगत व्यक्त केले. स्नेहसंमेलनाचे प्रास्ताविक रईसा खान- शेख यांनी केले. तर आभार संजय घुले यांनी मानले. यावेळी, राजेंद्र पाटील, बापू क्षीरसागर, सुनील बांगर ,अशोक कळसकर, कान्होबा तूपसागर, या पाहुण्यांचा ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला. दिवसभरां नंतर सर्वांनी जड अंत करणारे निरोप घेतला, या गेट टुगेदर चे चलते चलते मेरे गीत याद रखना कभी अलविदा ना कहेना…. या गीताने सांगता झाली.