चोरीच्या गुन्ह्यातील हस्तगत मालमत्ता (मूळ मालकाच्या)-फिर्यादीच्या स्वाधीन

कळंब /जयनारायण दरक
एक वर्षापासून धाराशिव जिल्हा पोलिसांनी वाशी पोलीस ठाण्याच्या एक, धाराशिव ग्रामीण एक, कळंब तीन, तुळजापूर तीन, नळदुर्ग एक, तामलवाडी एक, बेंबळी एक, आनंदनगर दोन, लोहारा एक, मुरूम एक अशा 19 गुन्ह्यातील जप्त केलेल्या १७ मोटरसायकल, दोन ट्रॅक्टर, दोन मोबाईल फोन, व ४५८९ ग्रॅम सुवर्ण दागिने असा एकुण २३,९९,८८९ ₹ किमतीचा मुद्देमाल हा आज दिनांक १/१२/२०२३ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृह येथे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते मूळ मालकांना-फिर्यादींना परत करण्यात आला. आपले चोरीला गेलेला मूल्यवान ऐवज-मुद्देमाल परत मिळवून दिल्याबद्दल याप्रसंगी मालमत्ता धारकांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले.
अप्पर पोलीस अधीक्षक गोहर हसन, पोलीस उपअधीक्षक सदाशिव शेलार, स्थानिक गुन्हे
शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सपोनि शैलेश पवार, पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच मूळ मालक उपस्थित होते.