रब्बी पिके बहरली पण रोगराईने खाल्ली

तेरणा काठ वृत्तसेवा
यंदा पावसाने येरमाळा परिसरात चांगली बरसात केल्याने शेतकऱ्यांनी गहू हरभरा व राजमा या पिकाला महत्त्व देऊन पेरणी केल्याचे दिसते. परंतु सतत येणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे पिकावर रोगराई मोठ्या प्रमाणात पसरली असून हाती आलेली पिके वाया जातात की काय याची भीती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे
एकीकडे सोयाबीनचे घसरलेले दर आणि दुसरीकडे वातावरणात सततचा होणारा बदल यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जाच्या खाईत लोटला जातो आहे.
बाजारात वाढत असलेल्या महागाईचा विचार करता शेतीमाला त्या प्रमाणात भाव नाही एकीकडे खताच्या घरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे तसेच फवारणीचे औषधेही मोठ्या प्रमाणात मागे आहेत परंतु पीक चांगले येण्यासाठी फवारणी काळाची गरज झाली असली तरी औषधाच्या किमती मात्र गगनाला भिडल्या आहेत यातच सोयाबीनचा दरही वाढत नाही. त्यामुळे वातावरणात बदल झाला की फवारणी ही करावीच लागते शेतकरी या खर्चातच होता नव्हता तेवढा बुडाला आहे.