येरमाळा येथे एल्गार नागरिकांचा मेघा कंपनीच्या व सुस्त ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात रास्ता रोको

पंढरपूर ते खामगाव या पालखी महामार्गाचे काम निकृष्ट करण्यात आले आहे. तसेच गावातील सर्व समस्या कायम असून याकडे ग्रामपंचायत जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी येरमाळा येथे बुधवारी रास्तारोको आंदोलन केले.
पंढरपूर खामगाव हा महत्वाचा पालखी मार्ग येरमाळा गावातून गेलाआहे. मार्गावरील येरमाळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते येरमाळा घाट या दरम्यान होणाऱ्या महामार्गाचे काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. ठिकठिकाणी अपूर्ण काम झाल्याने अपघातामध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत तर काहींना कायमचे अंपगत्व आले आहे. अशा अनेक असुविधांच्या जाळ्यात रस्ता अडकला आहे यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे गावातील समस्यांवर ही कायमस्वरूपी उपाययोजना नाहीत आंदोलनात या मागण्या प्रामुख्याने केल्या होत्या यामध्ये
विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरील रस्ता पूर्ण करणे.राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे त्वरित चालू करणे. येरमाळा चौकापासून ते येडेश्वरी मंदिर कमानी पर्यंत गतिरोधक बसवणे. ग्रामपंचायतीने दर दोन दिवसाला पाणीपुरवठा सुरळीत करणे. मेघा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे सिद्धार्थ नगर मधील पाण्याचा निचरा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित करणे. नाली गटारे तुंबलेले ग्रामपंचायतीने त्वरित स्वच्छ करून फवारणी करणे.येडेश्वरी देवस्थान मंदिर साठी उपलब्ध झालेला निधी विशेष ग्रामसभेमध्ये ठरल्याप्रमाणे खर्च करावा,गावातील खाजगी व शासकीय सर्व डॉक्टर्सनी संध्याकाळची सेवा उपलब्ध करून द्यावे,येरमाळा घाटातील अपूर्ण असलेला रस्ता ताबडतोब पूर्ण करणे. जलजीवन मिशनचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे.येरमाळा चौकापासून ते बांगरवाडी रस्त्यापर्यंत सिमेंट रस्त्याला जोडले जाणारे रस्ते ताबडतोब पूर्ण करणे व नाल्या पूर्ण करणे. नागरिकांसाठी बांधण्यात आलेली ग्रामपंचायत मधील स्वच्छतागृह वापरण्यासाठी उपलब्ध करून देणे.
येरमाळा गावामध्ये शासकीय सेवा देणारे सर्व विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांनी कामाच्या ठिकाणी वास्तव्यास रहावे. येरमाळा गावातील मतदार यादी मध्ये बोगस असलेली मतदार नोंदणी रद्द करण्यात यावी
. आंदोलनात राहुल पाटील, निशिकांत गायकवाड, विलास थोरबोले, अमोल पाटील, सुनिल बारकुल, अनिल पवार, सुनील पाटील, धनंजय बारकुल, अंकुश पाटील, माजी सरपंच मुरहारी कांबळे, मनोज बारकुल, सुहास बारकुल, रोहीत खलसे, बालाजी बारकुल, तेजस बारकुल, नागेश तोडकरी, नदीम मुलानी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.