पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमीत्त चोराखळीत स्वच्छता मोहीम

तेरणा काठ वृत्तसेवा –कळंब तालुक्यातील चोराखळी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आजोळ असल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमीत्त दि.२१ रोजी अकरा वाजता भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने येथील तीर्थक्षेत्र पापनाश मंदिरामध्ये अभिषेक करून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली व मंदिर परिसरामध्ये एक हजार वृक्षलागवड करण्याचा मानस केला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जयंती वर्ष देशभरात साजरी केली जात आहे . भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर दि.२१ ते दि.३० या दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमीत्त धाराशिव जिल्ह्यामध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . चोराखळी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आजोळ आणि जन्मगाव असल्याने अहिल्यादेवींनी बांधलेले पापनाश मंदिर हे दगडी बांधकाम केलेले हेमाडपंथी, पुरातन मंदिर असून हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी स्वतःच्या खर्चातून बांधलेले आहे .या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टीचे नूतन जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे ,प्रदेश कार्यकारी सदस्य खंडेराव चौरे, विकास बारकुल , मदन बारकुल, इंद्रजित देवकते, दत्तात्रय सोनटक्के, नितीन भोसले, राजसिंह राजे निंबाळकर, डॉ. गोविंद कोकाटे, खंडेराव मैंदाड, अभिमन्यु कोकाटे, दिगंबर मैंदाड, पांडुरंग मैंदाड,मकरंद पाटील,शिवाजी गिड्डे, राजाभाऊ बांगर, दत्ता बारकुल, गोपिनाथ मैंदाड, अशोक मैंदाड, विश्वंभर मैंदाड, चंद्रकांत कोकाटे, ॲड.श्रीकांत मैंदाड, अमर डोके, बालाजी गाढवे, आझाद शेख, तुळशीदास मैंदाड, दत्तात्रय मैंदाड, तुकाराम जगताप यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . – चोराखळी येथील श्री क्षेत्र पापनाश देवस्थानस्थळी अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा तसेच विविध पर्यटन विकासकामे,शोभा वाढविण्यासाठी स्मरणवस्तु,संग्रहालय, अहिल्यादेवींचा जिवनपरिचय दृष्य / देखावा अशी विकासकामे चौंडी या त्यांच्या गावाच्या धर्तीवर होणे आवश्यक आहे.
चोराखळी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मारक उभा करण्यासाठी मंदिराची १०५ एकर जमीन उपलब्ध असुन तिथे त्यांचे स्मारक उभा केल्याने समाजासाठी ते प्रेरणादायी ठरणार आहे .