ताज्या घडामोडी

धाराशिव शिवसेना यांच्या वतीने भव्य तिरंगा रॅली

तेरणा काठ वृत्तसेवा: पाकविरूद्ध भारतीय सैनिकांनी ‘सिंदूर ऑपरेशन ‘ राबवून जम्मू येथील पहलगाम येथे निष्पाप भारतीयावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा बदqला सैनिकांनी घेतल्याबद्दल व त्यांचे मनोधैर्य कायम उंचविण्यासाठी व सैनिकांच्या सन्मानार्थ धाराशिव शिवसेना यांच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे धाराशिव शहरात आयोजन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथजीभाई शिंदे यांच्या संकल्पनेतून व राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हयाचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या नेतृत्वा खाली करण्यात आले होते .
ही तिरंगा रॅली जिजाऊ चौकातून पुढे मार्गस्थ झाली
यावेळी शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख देवकते साहेब , जिल्हाप्रमुख सुरज सांळुखे, जिल्हा संघटक सुधीर पाटील , जिल्हाप्रमुख मोहन पनुरे ,तालुका प्रमुख अजित लाकाळ ,प्रेमाताई पाटील , शिवसेना विभाग प्रमुख , तालुका प्रमुख ,उप ता प्रमुख, शाखाप्रमुख , बुथ प्रमुख, शिवसैनिक तसेच पदाधिकाऱ्या सह हजारो शहरातील नागरिक व विदयार्थी तसेच वारकरी संप्रदायातील शेकडो टाळकऱ्यासह साधु – संत तसेच शहरातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या .
तिरंगा ध्वज शहरातील हजारो नागरिकांनी आपल्या हाती घेऊन जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली .
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने भव्य चित्ररथा द्वारे भारतीय सैनिकांच्या देखाव्यातून त्यांच्या कर्तृत्वाला व पराक्रमाला एक प्रकारे मानवंदना दिली , या देखाव्यासाठी कला शिक्षक शेषनाथ वाघ यांचे मार्गदर्शन लाभले .
जिजाऊ चौकापासून निघालेल्या या भव्य तिरंगा रॅलीचे स्वागत शहरातील नागरिकांनी जागोजागी केले , रस्त्याच्या दुतर्फा बाजूला उभे होते , ही रॅली छत्रपती संभाजी महाराज चौक , डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार घालून पुढे छ . शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहचली , या वेळी जिल्हा संपर्क देवकते साहेब यांनी आपल्या भाषणात भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑफरेशनच्या माध्यमातून जगाला आपल्या शक्तीची ओळख करून दिली तर जिल्हा शिवसेना संघटक सुधीर पाटील यांनी आपल्या भाषणात भारतीय सैनिकांच्या अतुलनीय शौर्याचे , पराक्रमाचे , शक्तीचे कौतुक करत संपूर्ण भारत आपल्या सोबत असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली . तर शिवसेना जिल्हा प्रमुख सुरज सांळुखे यांनी या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून प्रत्येक नागरिक हा सैन्यासोबत आहे , तनधन मनाने आपल्या सोबत कायम राहू, असे त्यांनी आभाराच्या निमित्ताने यावेळी म्हटले .

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.