सात्रा गावात शिवजयंती नाचून नव्हे तर वाचून साजरी

कळंब/ जयनारायण दरक
कळंब तालुक्यातील सात्रा या गावात यावर्षी शिवजयंती नाचून नव्हे तर वाचून साजरी करण्यात आली. या उत्सवात सकल शिवजन्मोत्सव समिती सात्रा यांच्या वतीने सुरज शिंदे या नव उद्योजक तरूणाच्या पुढाकारात जिल्हा परिषदेच्या सात्रा शाळेस दहा हजार रुपयांची पुस्तके भेट देण्यात आली. शाळेत आयोजित कार्यक्रमात कळंब पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक रामहरी चाटे,एन साई काॅलेजचे प्राचार्य जगदीश गवळी, धाराशिव कबड्डी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण तात्या मोहिते, सरपंच सौ रूपालीताई चव्हाण, कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण तात्या थोरबोले उपसरपंच ,सात्रा पोलिस पाटील तात्यासाहेब शिंदे, दत्तात्रय शिंदे, ग्रामसेवक वेदपाठक साहेब,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुदर्शन शिंदे ,उपाध्यक्ष बालाजी वाघमारे इ. मान्यवरांच्या हस्ते विविध परिक्षेत यश संपादन केलेले गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्रीडा स्पर्धेत यश मिळवणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
सत्कार करण्यात आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास शाल, पुष्पहार, गुलाब फूल व एक पुस्तक भेट देण्यात आले.
या कार्यक्रमात राज्य पातळीवर भालाफेक क्रिडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या यश धम्मपाल वाघमारे व स्काऊट गाईड मधील राज्य पुरस्कार विजेती वैष्णवी छत्रगुन गालफाडे या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला.
उपस्थितांना उपनिरीक्षक चाटे साहेब,प्रा जगदीश गवळी, लक्ष्मण तात्या मोहिते यांनी मंत्रमुग्ध करणारे मार्गदर्शन केले.कार्यक्रमात पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमात महिलांची उपस्थित लक्षणीय होती.सात्रा येथील सुरज शिंदे ,संतोष शिंदे, अण्णा शिंदे, संतोष थोरबोले, अमोल शिंदे, राजेंद्र थोरबोले, शरद पाटील, गणेश शिंदे, ओम शिंदे व काही युवकांनी बैठक घेऊन नियोजन केले व कार्यक्रम यशस्वी केला. सात्रा गावातील या तरूणांनी व नागरिकांनी पैशाचा अपव्यय टाळून समाजोपयोगी शिवजन्मोत्सव वेगळ्या पध्दतीने साजरा केला.यांच्या या उपक्रमाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे. सकल सात्रा समितीच्या सर्व तरूणांचा शाळेच्या वतीने मुख्याध्यापक दिपक कसबे यांनी सत्कार केला.शाळा व्यवस्थापन समितीच्या महिला सदस्यांचा सत्कार शिक्षिका इंदूताई वाघमारे यांनी केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सुरेखा चोभारकर, प्रास्ताविक शिक्षक राजेंद्र पवार तर आभार संतोष थोरबोले यांनी मानले.