श्री सद्गुरू निरंजन रघुनाथ स्वामी यांचे मंदिर निर्माण कार्यासाठी भूमिपूजन

कळंब/जयनारायण दरक
श्री दत्तभक्त वैराग्यमूर्ती श्री निरंजन रघुनाथ स्वामी जन्म (कार्तिक शुद्ध ८ शके१७०४ समाधीकाल भाद्रपद शुद्ध ११ शके १७७७ ) यांचे कळंब हे जन्मस्थान आहे दत्तभक्तित लीन होऊन त्यानी कळंब येथून प्रस्थान केले व पुढे ध्यानधारणा व तप केल्याने त्यांना अनुष्ठान प्राप्त झाले त्यांनी ज्ञानेश्वरी अमृत अनुभावावर , दत्तगुरुवर शंभर पदे ,व सद्गुरु रघुनाथ स्वामी (नाशिक) यांचे काव्यात्मक चरित्र लिहिले आहे त्यांचा जन्म कळंब येथील स्रोत्रे – कुलकर्णी दत्तभक्त परिवारात कसबा पेठ येथे झाला त्यांचे सुरुवातीची वीस वर्ष कळंब येथे वास्तव्य होते यानंतर गिरनार पर्वतावर त्यांनी तपश्चर्या केली त्यांचा मिरज येथे मठ आहे सद्गुरु निरंजन रघुनाथ स्वामी यांचे कळंब हे जन्मगाव असल्याने जन्म ठिकाणी मंदिर निर्माण व्हावे ही कल्पना महाराजांचे सदभक्त यशवंत दशरथ यांनी मांडली व या कार्यास त्यांनी पुढाकार घेऊन मंदिर निर्माण कार्य हाती घेतली आहे शिवाजीराव कुलकर्णी यशवंत कुलकर्णी, निरंजन कुलकर्णी, दिनकराव, पोरे इंजि.अशोकराव पोरे ,अनंतराव देशमुख यांनी या मंदिर निर्माण कार्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे . या कार्यास दिनांक २१ फेब्रुवारी रोजी मूर्त स्वरूप आले त्यानिमित्ताने देऊळकर गणपती मंदिराजवळील त्यांच्या मूळनिवास ठिकाणी मंदिर निर्माण साठी भूमिपूजन कार्यक्रम घेण्यात आला या निमित्ताने , श्री गुरुदत्त, सद्गुरू शंकर महाराज ,सद्गुरु निरंजन रघुनाथ स्वामी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन तसेच बांधकाम कार्यासाठी भूमिपूजन कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी श्री निरंजन रघुनाथ स्वामी महाराजांचे वंशज असलेले स्त्रोत्रे — कुलकर्णी परिवारातील शिवाजीराव कुलकर्णी ,राजाभाऊ कुलकर्णी, श्रीकांत राव कुलकर्णी, प्रभाकर राव कुलकर्णी, श्रीराम कुलकर्णी, कमलाकरराव कुलकर्णी व दिनकरराव पोरे, इंजि. अशोकराव पोरे ,विलास खांडेकर , सुभाष हरदास, दर्शन पोरे, अरुण पंचुत्रे, सुनील देशमुख ,धनंजय कुलकर्णी, खंडेराव देशमुख, जगदीश गोरे ,संभाजी मोरे ,पुरुषोत्तम हुलसुलकर, रमाकांत कुलकर्णी, अनिल कुलकर्णी, ऋषिकेश दशरथ ,नागनाथ घुले, माधवसिंग राजपूत, ज्ञानदेव कदम, राजाभाऊ वाघमारे ,नाना वाघमारे, मच्छिंद्र साखरे यांची उपस्थिती होती भूमिपूजन पौरोहित्य श्रीराम जोशी (केज) यांनी केले महाप्रसाद पंगत कळंब येथील अन्नदाते बंडोपंत दशरथ यांची होती कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची गरज असून सहकार्य करण्याची आवाहन यशवंतराव दशरथ व अशोकराव पोरे यांनी केले आहे