शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ कळंब मध्ये धडाडली

कळंब/जयनारायण दरक
शिवसेनेच्या संवाद मेळाव्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसापासून धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते. शुक्रवारी दुपारी त्यांची कळंब येथे जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या आमदारावर जोरदार टीका केली.
तसेच भाजपाच्या पक्ष फोडण्याच्या धोरणावर जबरदस्त टोलेबाजी केली. ते म्हणाले, खरी शिवसेना ही आहे. आम्ही बाळासाहेबाचे लढणारे शिवसैनिक आहोत. आमच्या शिवसेनेवर कोणीही दावा करू शकणार नाही.
या कार्यक्रमासाठी खासदार संजय राऊत, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, तालुका प्रमुख शिवाजी कापसे,काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्रीधर भवर,व शिवसैनिक उपस्थित होते.
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की,धाराशिव जिल्ह्याचे खासदार व आमदार हे वाघ आहेत.त्यांना कितीही ऑफर आल्या तरी सुद्धा ते एकनिष्ठ आमच्या सोबत राहिले.
एकनिष्टच उदाहरण म्हणजे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आमदार कैलास पाटील हे आहेत.
ज्या राज्यात व देशात महिलांना संरक्षण व न्याय देण्यासाठी न घेणारे सरकार असेल त्या राज्यात व देशात महिला असुरक्षित असून महिलांच्या समस्यांची दखल न घेणारे अन्याय कमी होत नेणाऱ्या राज्यात व देशातील महिलांना कशा महिला दिनाच्या शुभेच्छा द्यायचा हा मोठा प्रश्न आहे.
महिलांनी आता खंबीरपणे लढायला शिकायला पाहिजे असे ही वक्तव्य या वेळी उद्धव ठाकरे यांनी केले आहे.तसेच
बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री शिवसेनेचा करण्याचं वचन दिले होते ते मी पूर्ण करणारच. जर भाजपने पाठीत खंजीर खुपसला नसता तर तो शब्द पूर्ण झाला असता.
भाजपला धडा शिकवणे अजून बाकी आहे येणाऱ्या काळात ते ही दाखवून देऊ.महाराष्ट्रातील सगळे उद्योग धंदे गुजरात ला घेऊन गेले.हृदयात राम आणि हाताला काम असे आमचे हिंदुत्व आहे.भाजपचा डोलारा कोसळला आहे.देवेंद्र फडणवीस हे पाऊण मुख्यमंत्री आहेत.तसेच पंतप्रधान नरेंद्र
मोदी देशाचे गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,रावसाहेब दानवे यांच्यावर खडसून टीका केली असून 307 कलम काढण्यासाठी आम्ही सुद्धा पाठिंबा दिला होता तेंव्हा तो रद्द झाला आहे.काश्मीर जर मोकळा श्वास घेत असेल तर काश्मीर मध्ये मोदींनी निवडणूक का घेतली नाही असा सवाल सुद्धा यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता.येणाऱ्या काळात भाजपला घरचा रस्ता दाखवा असे आव्हान देखील ठाकरे यांनी यावेळी केले आहे.
कळंब शहरात उद्धव ठाकरेंची मोठी सभा पार पडली.या मध्ये नियोजन करणाऱ्या स्थानिकच्या नेत्यांचा शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील यांना स्थानिक नेत्यांचा विसर पडल्याने कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झाले असून सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत असल्याचे दिसून आले.