निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना :: येडाईचा रस्ता : आढावा बैठकीत बांधकाम विभाग फैलावर

येरमाळा येथील प्रसिद्ध आराध्य दैवत श्री येडेश्वरी देवीची चैत्र पोर्णिमा यात्रा अवघ्या वीस दिवसांवर आली असून यात्रेच्या प्रशासकीय नियोजित बैठकीत यात्रेच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेतील विषयावर आधारित आढावा बैठक आज तहसिलदार विजय अवधाने यांच्या अध्यक्षतेखाली येडेश्वरी मंदिर कार्यालयात पार पडली.इतर विभागांच्या तुलनेत यात्रा संदर्भात तयारीत बांधकाम विभागा कडून दिरंगाई होत असल्याने तहसिलदार यांनी चांगलेच फैलावर घेतले याञे अगोदर रस्ता पुर्ण करा असे सुचित केले.
येडेश्वरी मंदिरात आयोजित आढावा बैटकीसाठी पोलिस उपविभागीय अधिकारी संजय पवार,गटविकास अधिकारी आर.व्ही.चकोर,सपोनि महेश क्षिरसागर , सरपंच मंदाकिनी बारकुल,माजी सरपंच विकास बारकुल,उपसरपंच गणेश बारकुल,देवस्थानचे अध्यक्ष बापूसाहेब बेदरे,ग्रामस्थ,पुजारी, यांच्यासह याञा संबधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रे बाबत २० दिवसापूर्वी यात्रा नियोजन बैठकीच्या अनुषंगाने यात्रा काळात केल्या जाणाऱ्या तयारी संदर्भात आरोग्य,पाणीपुरवठा,जि.प. बांधकाम,विभागाने तयारीची माहिती दिली.ग्रामपंचायतकडुन मुबलक पाणी पुरवठा व शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येणार असुन याञा प्रशासनाला पुर्णपणे सहकार्य करण्यात येणार आहे.तसेच मंदिर ट्रस्टने मंदिर परिसरात,आमराई परिसरात सी.सी.टिव्ही कॅमेऱ्यांची तसेच पिण्याच्या पाण्याची सोय,पोलिस बंदोबस्ताच्या जोडीला खाजगी कंपनीच्या सुरक्षा रक्षक तुकडी नेमाल्याचे केल्याचे सांगितले.पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्त कामी कर्मचारी अधिकाऱ्यांची व्यवस्था केली असुन दोन कन्ट्रोल पांइट केले असुन याठिकाणाहुन महावितरण,ग्रामपंचयत,आरोग्य विभाग ग्रामपंचायत प्रशासन आदी विभागाशी संपर्कामध्ये असणार आहेत तसेच येणार्या भाविकांच्या सोईसुविधेसाठी सर्वांनी सहकार्य करुन सुचना कराव्यात पोलिस प्रशासनाकडुन योग्य सुचनेच पालन केले जाईल व उपाय योजना केल्या जातील तसेच येणार्या वाहनांच्या पार्कींची चोख व्यवस्था करण्यात येणार असुन वाहतुक कोंडी टाळण्यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे असे सपोनि महेश क्षिरसागर यांनी सांगितले.
यावेळी चर्चेत यात्रा काळात महत्वाची अडचण असलेला येडेश्वरी मंदिर रस्ता खुप महत्त्वाचा असुन रस्ता पुर्ण होत आहे माञ या मार्गावरील पुल न केल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूनी पाच ते सात फुट खोल खड्डे असल्याने याञा काळामध्ये अपघाताची शक्यता नाकरता येत नाही त्यामुळे बांधकाम विभागाने मंदीर मार्ग गांभिर्याने घ्यावा अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे.