पोलीसांच्या कारवाईने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले

कळंब/ जयनारायण दरक-
कळंब व ढोकी परिसरात कधी नव्हे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू विक्री अड्ड्यावर कारवाया होत आहेत. त्यामुळे अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहे. हॉटेल , ढाबे चालकांनी विनापरवाना दारू विक्री बंद केली आहे ; परंतु निवडणुका असल्यामुळे दारू अड्ड्यावर अजून बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. निवडणूक संपल्यानंतर पुन्हा दारूचे अड्डे सुरू होणार नाहीत याची काळजी ही पोलिसांनी घ्यायला हवी, नाहीतर निवडणूक संपल्यानंतर अवैध विक्रीचे दारू अड्डे पुन्हा सुरू होतील कळंब व शिराढोण परिसरात नागरिकांमध्ये चर्चा
लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू झाल्याने पोलिसांनी जिल्हाभरातील अवैध दारू विक्री करण्यात विरोधात मोहीम तीव्र केली असून, गेल्या महिनाभरात जिल्ह्यात सर्वत्र 124 छापे टाकून तब्बल 4600 हजार लिटर दारू जप्त करण्यात आली आहे.
जप्त करण्यात आलेल्या गावठी दारूची एकूण किंमत 12लाख 75 हजार एवढी आहे.
त्यामुळे किमान निवडणुकीपुरता का होईना, पण जिल्हा दारू मुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 16 मार्च रोजी जाहीर झाली, तेव्हापासून पोलीस दल अलर्ट मोडवर आले आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अतुल कुलकर्णी यांनी पोलीस अधीक्षक म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर अवैध मध्ये विरोधात अतिशय कडक कारवाई करण्यास सुरुवात केली होती.
दररोज अवैध मध विरोधी मोहिमेच्या माध्यमातून जिल्हाभर वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून गावठी दारूचे अड्डे उध्वस्त करून, अवैध विक्रीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. धाराशिव जिल्ह्यातील अवैध दारू विक्री करणारे हॉटेल्स, ढाबे, टपऱ्या, दुकानाचा शोध घेऊन छापे टाकण्यात येत आहेत.
यामध्ये स्थानिक गुन्हा शाखेने खबर्यामार्फत गुप्त माहिती घेऊन जिल्ह्यात गावठी दारूचे अड्डे कुठे आहेत याची माहिती घेऊन ही मोहीम सुरू केलेली आहे.
गेल्या 28 दिवसात पोलिसांनी 124 छापे टाकले आहेत. पोलिसांकडून दररोज किमान तीन ते चार छापे टाकले जात आहे. तर आठवड्यातून एक दिवस दहा ते बारा छापे टाकण्याची मोठी मोहीम राबवली जात आहे.
अगोदर गावठी दारूचा विरोधात महिनाभरात चार-दोन कारवाया करणाऱ्या जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांनी कारवाईत आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे. एक महिन्यात जप्त करण्यात आलेल्या गावठी दारूची किंमत तब्बल 12 लाख 75 हजार इतकी आहे