ज्यांने शेतकऱ्यांचा तेरणा कारखान्याचे भंगार विकून खाल्ले त्यांना आमदार राणा पाटलांवर बोलण्याचा अधिकार नाही = घोगरे .

(कळंब = प्रतिनिधी) ज्यांनी शेतकऱ्यांचा तेरणा कारखाना पाच वर्षे ही नीट चालविला नाही आणि नंतर कारखान्यातील भंगार ही विकून खाल्ले त्यांना आमदार पाटलांवर बोलण्याचा अधिकार नाही अशी टीका भा.ज.पा.चे जिल्हा उपाध्यक्ष घोगरे यांनी एकुरका येथील महायुतीच्या उमेदवार सौ .अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेत बोलताना खासदार ओमराजे वर टीका केली अधिक वृत असे की, सौ. अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी एकुरका येथे कॉर्नर सभा झाली त्या सभेला सुरेश पाटील, मा. तालुका अध्यक्ष रामहरी शिंदे, किरण पाटील, मा .सरपंच शरद भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती त्या सभेत बोलताना भाजपाचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष संजय घोगरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेसाठी केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली त्याचबरोबर पुढे बोलताना घोगरे यांनी आमदार राणा पाटील व महायुतीच्या उमेदवार सौ अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गावात केलेल्या विकास कामाची माहिती दिली त्याचबरोबर ज्यांना शेतकऱ्यांचा तेरणा कारखाना पाच वर्षे नीट चालविता आला नाही शेवटी कारखान्यांचे भंगार विकून खाल्ले त्या ओमराजेंना आमदार पाटलांवर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही अशी टीका घोगरे यांनी ओमराजे वर केली व किती रडा पडा पण जनता सौ अर्चना पाटलांनाच मोठ्या फरकाने विजयी करणार असा विश्वास ही संजय घोगरे यांनी व्यक्त केला.