ताज्या घडामोडी

महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या घड्याळाला मतदान करावे — बसवराज पाटील

धाराशिव

देशात नरेंद्र मोदींना बळ देण्यासाठी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या घड्याळाला मतदान करावे, असे आवाहन माजी मंत्री बसवराज पाटील यांनी औसा येथील प्रचार सभेत बोलताना केले.

यावेळी बसवराज पाटील म्हणाले की, देशाला सुरक्षित आणि भक्कम करण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.अर्चणाताई पाटील यांच्या प्रचारार्थ औसा येथे आयोजित सभेला संबोधित करीत महायुती सरकारचे महत्त्व आणि नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाचे श्रेष्ठत्व याविषयी अनेक बाबी मांडल्या.

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश प्रगतीची परीसीमा गाठत आहे. गेल्या १० वर्षात देशात अनेक नवे प्रकल्प उदयास येऊन मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. परदेशी तंत्रज्ञानाला न अवलंबता देश स्वदेशी तंत्रज्ञानाने पुढे चालला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त विकसित भारत घडावा हे ध्येय उराशी बाळगून मार्गक्रमण करणाऱ्या महायुती सरकारला बळ देणे गरजेचे आहे. याकरिता सर्वांनी मतदान करावे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीच्या उमेदवार सौ. अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांना मताधिक्य द्यावे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी मंत्री संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, व्यंकटेश बेंद्रे, अफसर शेख, सुनील उटगे, किरण उटगे,अँड कुलकर्णी, संगमेश्वर ठेसे, बसवराज धाराशिवे,आक्रम पठाण, अँड वागदरे,हणमंत राचट्टे,दत्तु अण्णा कोळपे, बंडू केंद्रे,कंटप्पा मुळे महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.