ताज्या घडामोडी

वंचित बहुजन आघाडीच्या आरक्षण बचाव यात्रेचे येरमाळा येथे जंगी स्वागत.

तेरणा काठ न्युज

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सुरू केलेली आरक्षण बचाव यात्रा येरमाळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दाखल होताच फटाक्याच्या आतिषबाजीने स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी या आरक्षणाच्या निर्माण झालेल्या वादामुळे ओबीसी व मराठा समाजात दुही निर्माण होत असून हे दोन्ही समाज एकमेकाला पाण्यात बघत आहेत. या दोन समाजात ही सामाजिक दरी वाढू नये दोन्ही समाजाचा सामाजिक सलोखा टिकावा यासाठी गावातील सर्वांनी पुढाकार घेऊन सामाजिक सलोखा राखण्याचे काम करावे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले व या आरक्षण बचाव यात्रेची सांगता सात ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणार असून यासाठी ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले यावेळी येरमाळा परिसरातील ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.