ताज्या घडामोडी

पेरणीपूर्वी अनुदान रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा -आ.कैलास पाटील

धाराशिव जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची व दुष्काळी मदत पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी राज्याच्या मदत व पुनर्वसन सचिव डॉ. सोनिया सेठी यांची भेट घेऊन मागणी केली व जिल्ह्यातील गंभीर परिस्थितीची माहिती दिली.

धाराशिव जिल्हयात मागील चार दिवसापासुन अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे, फळ बागांचे, जनावरांचा मृत्यू, राहती घरे, जनावरांचे गोठे, कुक्कुटपालन शेड यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. सध्या पेरणीचे दिवस जवळ आलेले आहेत. शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी बि-बियाणे, खते आणण्यास पैसे उपलब्ध नसल्यामुळे त्याचे फक्त पंचनामे, घोषणा न करता पेरणीपुर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणे आवश्यक आहे.

जिल्हयात दि. ११ एप्रिल तसेच त्यानंतर दि. २० एप्रिल रोजी अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे व फळबागांचे मोठया प्रमाणावर नुकसान झालेले होते. या नुकसानीच्या भरपाई पोटी २६४२ शेतकऱ्यांना सुमारे ४७८ लक्ष रुपये मदतीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडुन आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सादर झाला असुन, प्रलंबित असलेला सदर प्रस्ताव तात्काळ मागवुन पेरणीपुर्वी नुकसान भरपाई द्यावी..

तसेच धाराशिव, लोहारा, वाशी या तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असुन उर्वरीत कळंब, तुळजापुर, उमरगा, भुम, परंडा तालुक्यातील ३३ मंडळांना दुष्काळ सदृष्य म्हणुन घोषीत करण्यात आलेले आहे. या तालुक्यांतील शेतकऱ्यांना दुष्काळ घोषीत केलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांप्रमाणे दुष्काळी अनुदान देणेबाबत घोषणा करण्यात आलेली होती. परंतु अद्यापपर्यंत दुष्काळाची एक रुपयाचीही मदत दिलेली नाही.त्यामुळे फक्त घोषणा व पंचनामे न करता, पेरणीपूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी आपल्या स्तरावरून तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली..

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.