येरमाळा गावातील सात ते आठ प्रतिष्ठित लोकांवर वाशी,येरमाळा पोलिस ठाण्यात खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले.त्या निषेधार्थ ग्रामस्थांचा गाव बेमुदत बंद व पोलीस अधीक्षकांना निवेदन

येरमाळा येथील मंगळवारी घडलेल्या दरोडा प्रकरणातील तिघांना रंगेहात पकडून दरोडा प्रकरणात बारा जनावर गुन्हा दाखल झाला आहे.याच प्रकरणातील म्होरक्या,गावगुंडाच्या सांगण्यावरुन लोकांनी दरोडा प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या येरमाळा गावातील सात ते आठ प्रतिष्ठित लोकांवर वाशी,येरमाळा पोलिस ठाण्यात खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले.त्या निषेधार्थ ग्रामस्थांनी गाव बेमुदत बंद पुकारून खोटे गुन्हे करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करुन गुन्हे मागे घेण्यात यावे अन्यथा रास्ता रोको आंदोलचा इशारा पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक धाराशिव यांना दिलेल्या निवेदनात मंगळवार ता.२८ रोजी येरमाळा घाटामध्ये ट्रक अडवून दरोडा घालण्याचा गुन्हा घडला होता, त्यामध्ये दोघे जण जागीच सापडल्याने पोलिसांनी त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.यामध्ये काही तेरखेडा व कडकनाथवाडी येथील गावगुंडाचा सहभाग होता.यापूर्वीही या गावगुंडांनी येरमाळा येथे अनेकांना हाणामारीचे प्रकार केले होते. त्यावरून काही गुन्हे त्या गावगुंडांच्या नावावर येरमाळा पोलीस स्टेशन मध्ये दाखल आहेत.
पूर्वीच्या भांडणाचे राग मनात धरून व या दरोडयाच्या गुन्ह्यामुळे राग मनात धरून बेरमाळा गावच्या प्रतिष्ठित नागरिकांवर अॅट्रॉसिटी च्या तक्रारी या गावगुंडांनी दाखल केल्या आहेत.त्यामुळे येरमाळा गावांमध्ये गावकऱ्यात तीव्र संताप निर्माण झाला आहे.या घटनेच्या निषेधार्थ येरमाळा येथील गावकऱ्यांनी खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी,खोटे दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी करीत उत्स्फूर्तपणे गावकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून तीव्र निषेध व्यक्त केला आहे. शुक्रवारी ता.३१ रोजी गावातील राष्ट्रीय महामार्गवर रास्ता रोको करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
तरी पोलिस प्रशासनाने वस्तुस्थितीतीची चौकशी करुन अॅट्रॉसिटीचे दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्याबाबत संबंधितांना आदेशीत करावे, व संबंधित लोकांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा न्याय व हक्काच्या मागणीसाठी पुढील काळात याहुनही तीव्र आंदोलन केले जाईल, याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील,असे निवेदनात म्हंटले आहे.या निवेदनावर दीडशेच्यावर ग्रामस्थांच्या सह्या आहेत.