दयावान प्रतिष्ठान आणि सरकार ग्रुपची”हजरत मोहम्मद पैगंबर कन्या रत्न मुदत ठेव योजना”

तेरणा काठ न्युज
कळंब प्रतिनिधी सिकंदर पठाण
अनाथ आणि गरीब कुटुंबातील मुलींच्या शिक्षणासाठी आणि आर्थिक कल्याणासाठी राबवली आहे. या योजनेचा उद्देश मुलींच्या भविष्याची शैक्षणिक आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करणे आहे. या योजनेत मुलींच्या नावाने ठराविक रक्कम मुदत ठेव (Fixed Deposit) म्हणून जमा केली आहे जी ठराविक कालावधीनंतर मुलीसाठी अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर पूर्ण रक्कम 60000 रुपये स्वरूपात त्या मुलीला मिळणार आहे
प्राथमिक स्वरूपामध्ये पंधरा मुलीं च्या नावे मुदत ठेव रक्कम जमा करण्यात आली आहे यामध्ये सर्व समाजाच्या मुलींची निवड करण्यात आली आहे जात-पात न मानता जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मानवता हाच एकमेव धर्म आहे त्यामुळे हा आदर्श उपक्रम राबविण्यात आला आहे
मुलींचे भविष्य सुरक्षित योजनेद्वारे मुलीच्या नावाने जमा केलेली रक्कम तिच्या शिक्षणासाठी किंवा त्या च्या भविष्यातील गरजांसाठी वापरली जाऊ शकते.
या योजनेमुळे सर्व धर्मीय समाजात सकारात्मक संदेश या योजने द्वारे देण्याचा त्यांचा प्रयत्न हा यशस्वी आहे
विशेष बाब म्हणजे दयावान ग्रुप आणि सरकार ग्रुप यांनी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती साठी डीजे चा अनावश्यक खर्चाला फाटा देत समाजकार्य करून समाजामधील अनाथ व गरीब घरच्या परिवारासमोर मुलींच्या शैक्षणिक जबाबदारीचा तसेच अत्यावश्यक असणाऱ्या गरजांचा विचार करून ही योजना राबवण्याचा त्यांचा संकल्प हा पूर्ण महाराष्ट्राने डोळ्यासमोर ठेवून सर्व धर्मीय बांधवांनी या उपक्रमाचा अवलोकन करून आदर्श घ्यावा .
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून कळंब धाराशिव चे आमदार कैलास घाडगे पाटील यांची उपस्थिती लाभली त्यांचे मनोगत व्यक्त करताना मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी ही तुमच्या प्रतिष्ठानने प्रतिष्ठान मध्ये असणाऱ्या प्रत्येक युवकांनी घेतली आहे त्याबद्दल आपलं करावं तेवढं कौतुक कमीच आहे असे मत व्यक्त केले तसेच त्यांनी सर्व धर्मीय बांधवांना डीजे तसेच अनावश्यक खर्च न करता या उपक्रमाचा आदर्श घ्यावा तसेच समाज उपयोगी कार्यक्रम राबवून समाजा मधील सर्व मुलींची शैक्षणिक व सुरक्षिततेची जबाबदारी घेणे गरजेचे आहे असे मत व्यक्त करत हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या
उपविभागीय पोलीस अधिकारी कळंब संजय पवार सर यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती त्यांच्यासोबत कळंब पोलीस स्टेशनचे प्रभारी रवी सानप सर स्थानिक गुन्हे शाखेचे मायदे सर यांची उपस्थिती होते. दयावान प्रतिष्ठान आणि सरकार ग्रुप च्या उपक्रमाचा आदर्श सपूर्ण महाराष्ट्र ने घ्यावा आणि सर्व धर्मीय बांधवांनी महापुरुषांच्या जयंती तसेच सण-उत्सव याच्यामध्ये डीजे चा वापर करायचाच नाही त्या कणकर्ष आवाजापासून तसेच लेझर किरणामुळे मानवी जीवनावर होणारा प्रभाव तसेच होणाऱ्या त्रासापासून आपले आणि आपल्या समाजामधील वृद्ध व्यक्ती अबाल बालके महिला माता भगिनी विद्यार्थी यांचे संरक्षण करावे हा उपक्रम अतिशय आदर्शवादी आहे असे मत व्यक्त त्यांनी केले.भारतीय जनता पार्टी पक्षाचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे हे या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित होते त्यांनी सर्वपक्षीय बांधवांना तसेच सर्व धर्मीय बांधवांना सांगण्याचा प्रयत्न केला की आपण महापुरुषांच्या जयंती उत्सवामध्ये कसल्याही प्रकारचा डीजे चा वापर करायचा नाही असे मत व्यक्त केले
ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ यांची उपस्थिती होती ..
सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिक महासंघाने कळंब शहर डिजे मुक्तीची संकल्पना मांडली आणि संपूर्ण शहर जनजागृतीचा नारा देत या उपक्रमासाठी शहरवासीयांना तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी शहरांमधील सर्व शैक्षणिक संस्था यांना रॅलीद्वारे डीजे मुक्तीचा संदेश दिला होता त्यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा देत आपण इथून पुढे महापुरुषांच्या तसेच सन उत्सवांमध्ये डीजे मुक्तीचा संदेश देत जनजागृती करणार असल्याचे मत व्यक्त करत मुस्लिम बांधवांना हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या…
या कार्यक्रमासाठी दयावान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष इम्रान मुल्ला, सरकार ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कलीम शेख, संजय मुदडा,तारेख मिर्झा , अकीब पटेल ,मुस्ताक भाई कुरेशी ,मीनाज शेख, सागर बाराते , अजित पिंगळे, महादेव महाराज अडसूळ ,डि के कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार बालाजी बप्पा अडसूळ, महेंद्रसिंग राजपूत ,विकास कदम, संदीप भैया बाविकर ,वसीम पठाण, खालेद हाफिसाब, अली हफिसाब, सुलेमान मिर्झा ,सिकंदर पठाण,सरपंच नानासाहेब धाकतोडे, भैय्यासाहेब खंडागळे, राजाभाऊ गिड्डे प्रदीप मेटे ,अमर शेख ,विश्वजीत जाधव, नजीर शेख, तानाजी चौधरी, श्याम नाना खबाले, तानाजी तनपुरे, सलमान शेख, संयोजिनि राऊत , रुकसाना बागवान, सरला ताई सरोदे , ईतर मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती.