ताज्या घडामोडी

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब येथे नामांतराचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

तेरणा काठ न्युज

कळंब – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब जिल्हा धाराशिवची स्थापना ०१ ऑगस्ट १९८४ रोजी कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या छोट्या अशा गोदाम येथे करण्यात आली होती. १९९७ यावर्षी तांदुळवाडी रोड येथे १९ एकर क्षेत्रात सुसज्ज अशी प्रशासकीय इमारत आणि कार्यशाळेत स्थलांतर करण्यात आला. सुरुवातीला एकूण ११ ट्रेड संस्थेत चालत असून त्यातील कमी मागणीचे ०२ ट्रेड बंद करण्यात आले असून सध्यस्थितीत ०९ ट्रेडच्या १५ तुकड्या पूर्ण क्षमतेने कौशल्यपूर्ण स्थितीत चालू आहेत. संस्थेत एकूण ३२० प्रशिक्षणार्थी घेत असून त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ०१ प्राचार्य, ०१ गटनिर्देशक, १६ शिल्प निदेशक, ०१ भांडारपाल, ०१ मुख्य लिपिक, ०३ वरिष्ठ लिपिक, ०३ कनिष्ठ लिपिक, ०४ शिपाई, ०४ पहारेकरी अशा एकूण ३४ अधिकारी – कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते.
मागील ०४ वर्षापूर्वीच संस्थेच्या पाठीमागील बाजूस १०० मुलांचे वस्तीगृह बांधले असून त्या वसतीगृहाचा प्रथम ०२ वर्ष कोव्हिड सेंटर म्हणून फायदा झाला असून आता पुढे ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रशिक्षणर्थ्यांसाठी याचा उपयोग होणार आहे.
मागील ४० वर्षापासून शासकीय आय टी आय म्हणून ओळखले जाणारे आता संतश्रेष्ठ गोरोबा काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब जिल्हा धाराशिव म्हणून ओळखले जाईल.सदरील संस्थेच्या नामांतराचा सोहळा १३ ऑक्टोबर सायंकाळी ०५ वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. नामंतरांच्या कार्यक्रमासाठी प्रमूख पाहुणे म्हणून तुळजापूर विधानसभा सदस्य राणाजगजितसिंह पाटील,
विधानपरिषद सदस्य विक्रम काळे, नितीन काळे, प्रकाश महाराज बोधले, महादेव महाराज अडसूळ, अजित पिंगळे, सरोजिनी राऊत, सतीश दांडणाईक, अमित शिंदे उपस्थित होते तर कळंब परिसरातील गोकुळदास करडे, पांडुरंग कुंभार, अमर मडके, संताजी वीर, विकास बारकुल, सतपाल बनसोडे, किशोर वाघमारे, शिवाजी गिड्ड, बंडू बनसोडे, बालाजी गायकवाड, राहुल हौसलमल उपस्थित होते. सदरील कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्राचार्य केशव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गटनिदेशक शामकांत डोंगे, भांडारपाल बाजीराव राऊत, शिल्पनिदेशिक अंकुश माळकर, बालाजी पांचाळ, कल्लेश भोसले, धैर्यशील मडके, अक्षय सुतार, एस एस कुटवाड, मंचक जाधव, नदीम शेख, वसंत टोपे, शिल्पनिदेशिका रंजना फुलारी, गोदावरी वडजकर, ज्योती शिंदे, कोमल मेंडके, कल्याणी भराटे, वरिष्ठ लिपिक विलास सुरवसे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी पप्पू मडके, रवींद्र जेथिथोर, फरजना शेख, सर्व प्रशिक्षणार्थी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिल्पनिदेशक किरण झरकर यांनी केली तर आभारप्रदर्शन शिल्पनिदेशक अंकुश माळकर यांनी मानले. नामांतराच्या कार्यक्रमासाठी विवीध वृत्तवाहिनीचे वृत्तनिवेदक,
वृत्तपत्राचे पत्रकार बंधू, जेष्ठ नागरिक, विविध समाजातील बांधव मोठ्या संख्येने हजर होते, कार्यक्रमाची सांगता मिठाई वाटप करून राष्ट्रगीताने झाली.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.