ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांनी आपला राहीलेला ऊस १५ मार्चपर्यंत गाळप करुन घेण्यात यावा

कळंब तालुक्यातील धाराशिव साखर कारखाना लि, चोराखळी धाराशिव या साखर कारखान्याचे कार्यक्षेत्रातील सर्व सभासद,बिगर सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला राहीलेल्या ऊस गाळप करुन घेण्यात यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

धाराशिव साखर कारखान्याचा सन २०२३-२४ चा गाळप हंगाम दि. १५ मार्च दरम्यान बंद होणार असुन ज्या ऊस उत्पादकांचा या हंगामासाठी कारखान्याकडे नोंद व बिगर नोंद, न्यायप्रविष्ट, आपसातील तक्रारीमुळे, रस्त्या अभावी, नापीक ऊस अद्याप तोडणी अभावी ऊभा आहे, अशा सर्वांनी दि.१३ मार्चपुर्वी कारखान्याचे शेती विभागाशी संपर्क साधुन आपण स्वतः ऊस तोड व वहातुक करुण गाळपास पाठवण्याची व्यवस्था करुन ऊस गाळप करुन घ्यावा असे आवाहन कारखाना प्रशासनाकडून करण्यात आले आहे तसेच सदर नोंद किंवा बिगर नोंद ऊस गाळपा अभावी शिल्लक राहिल्यास अथवा राहणार नाही यांची काळजी घ्यावी असे सांगण्यात आले आहे

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.