ताज्या घडामोडी

डि.व्ही.पी. धाराशिव साखर कारखाना चोराखळी या कारखान्याच्या १३ वा गळीत हंगाम सन २०२४-२०२५ चा बॉयलर अग्नी प्रदिपन कार्यक्रम संपन्न

तेरणा काठ वृत्तसेवा 

डि.व्ही.पी. धाराशिव साखर कारखाना लि. चोराखळी ता. कळंब, जि. धाराशिव या कारखान्याच्या १३ वा गळीत हंगाम सन २०२४-२०२५ चा बॉयलर अग्नी प्रदिपन कार्यक्रम दिनांक १२/११/२०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता कारखान्याचे संचालक संदिप खारे यांच्या हस्ते पार पडला.

या प्रसंगी येरमाळ्याचे सौ. सुखमाला व प्रा.श्री. सुनिल शहाजी पाटील या दाम्पत्यांच्या हस्ते होमहवन पुजा करण्यात आली. यावेळी सुरेश (तात्या) पाटील, अज्म्मुदिन मुलानी, मालोजीराव गलांडे, हरिश्चंद्र भगत, यशवंत कवडे, एम.एस.सी बँकेचे कारखाना प्रतिनिधी. एच. बी. शेवाळे कारखान्याचे जनरल मॅनेजर ए.एस पठाण, सुंदर साळुंखे,. वैभव देशमुख, श्री. दयानंद गव्हाणे, सुनिल लोमटे, बाबासाहेब वाडेकर, सर्व कर्मचारी व कामगार तसेच कारखाना परिसरातील शेतकरी व वाहतुक ठेकेदार कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तावीक जनरल मॅनेजर  ए.एस पठाण यांनी केले. गळीत हंगाम २०२४-२५ करिता  व्यवस्थापणामार्फत ३ लाख टन गाळप करण्याचे उदिष्ठ पुर्ण करन्याचे आव्हान सर्वं कर्मचा-यांना केले. तसेच गाळप उदिष्ठ पुर्ण करण्याच्या दृष्टीने कारखान्यातील मशीनरी ची सर्व कामे पुर्ण झाली असून ऊस तोडणी वाहतुक यंत्रना व कारखाना गाळपासाठी सज्ज असल्याचे सांगीतले.तसेच चीफ इंजीनिअर. वैभव देशमुख यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन करुन कार्यक्रम संपल्याचे जाहिर केले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.