ताज्या घडामोडी

मंगरूळ परिसरात ऊसाला प्रति टन ३५००दर दिल्याशिवाय तोडणी नाही

कळंब/जयनारायण दरक –

कळंब तालुक्यातील मंगरूळ येथे शुक्रवारी (दि.६) ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक झाली.
यामध्ये उसाला प्रति टन ३५०० रुपये दर कारखान्याने द्यावा असा ठराव ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सर्वानुमते घेतला आहे.
अशी माहिती शेतकरी प्रभाकर जाधव, अँड घनश्याम रितापुरे, यांनी दिली.
तसेच ऊस दराबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत कोणीही गावात ऊस तोडणी करणार नाही असेही या बैठकीत ठरले आहे.
मंगरूळ शिवारात पावसाअभावी पाझर तलाव कोरडेटाक आहेत.
साखर कारखाने तसेच गुळ पावडर कारखाने ऊस तोडणी साठी येतात. मंगरूळ गाव ऊसासाठी प्रसिद्ध आहे.
यंदा शेती उत्पादकावर मोठा परिणाम झाला आहे. पाणी नाही परिणामी रब्बी उत्पादन होणार नाही. शेतकऱ्यांना ऊस पिकाचा मोठा आधार आहे. पाण्याअभावी मोडीत निघणार आहे. मागील हंगामात नॅचरल शुगरने 2800 रुपये भाव दिला. इतर कारखान्याने 2500 रुपये पर्यंत भाव दिला.
यंदा ऊसाला 3500 रुपये प्रति टन भाव दिल्याशिवाय ऊस तोडणी न करण्याचा निर्णय दि.6 रोजी झालेल्या बैठकीत सर्व सहमतीने घेतला आहे.
या बैठकीस रामदास माने, चंद्रसेन पाटील, अमृत जाधव, पुरुषोत्तम रितापुरे, बिभिशन निंबाळकर, अभिजीत झाडके, माणिकराव जाधव ,वैभव काळे, अशोक पाटील, शरद चौधरी, केतन रितापुरे, झुंबर जाधव व आदीसह जवळपास शंभर ते दीडशे शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.