दि.पिपल मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या शाखेची येरमाळ्यात सुरुवात

तेरणा काठ वृत्तसेवा
अत्यंत कमी कालावधीत चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्याची नवीन ओळख निर्माण करणाऱ्या डीव्हीपी ग्रुपच्या दि.पिपल मल्टीस्टेट सोसायटीच्या शाखेचे येरमाळा येथे शिवजयंतीचे निमित्त साधून शुभारंभ करण्यात आला
. या शाखेमुळे अनेक गावच्या ऊसउत्पादक शेतकऱ्यांची सोय होणार आहे.धाराशिव साखर कारखान्याचे येरमाळा परिसरातील वीस ते पंचवीस गावासह बार्शी,वाशी,कळंब तालुक्यातील हजारो ऊसउत्पादक सभासद असुन कारखाण्याला ऊस दिल्या नंतर कारखान्याचे ऊसबिल उचलन्यासाठी कारखान्यावर असलेल्या बँकेच्या शाखेत जावे लागत असे. शेतकरी सभासदांची होणारी गैरसोय पाहता डिव्हीपी ग्रुपचे संस्थापक तथा धाराशिव करखान्याचे चेअरमन आमदार अभिजीत पाटील यांनी येरमाळा येथे कारखान्याचे संचालक प्रा.सुनिल पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार व सर्वांगिण सभासदांचा विचार करून डिव्हीपी ग्रुपची दि.पिपल ची शाखा सुरु करण्याचा निर्णय घेतला. यामुळे धाराशिव साखर कारखान्याच्या सभासदांची गैरसोय दुर होणार आहे. शिवाय येरमाळा हे गाव व्यवसायिक दृष्ट्या प्रगत असल्याने व्यावसायिकांना या बँकेचा फायदा होणार आहे.
शिवजयंती निमित्त दि.पिपल मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या शाखेचा पोलीस स्टेशन समोरील सुनील पाटील यांच्या कॉम्प्लेक्स मध्ये शुभारंभ करण्यात आला.या वेळी डिव्हिपी ग्रुपचे अर्जुन पाटील,प्रा.सुनील पाटील, जनरल मॅनेजर शशीकांत जगताप, विभागीय अधिकारी दत्ता देवडीकर,जनहितचे परिवारानचे अध्यक्ष संतोष तौर,येरमाळा पत्रकार संघांचे सचिव दत्ता बारकुल, पत्रकार,बालाजी रमेश बारकुल, तानाजी बारकुल,सुधीर लोमटे, दीपक बारकुल,वल्लभ माशाळकर, अंकुश पाटील, सतिश पाटील, पी.एम बारकुल,अनिल पाटील, अनिल बारकुल, यांच्यासह शाखेचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.