सच्चिदानंद बांगर,नशामुक्त नॅशनल पुरस्काराने सन्मानित

आयुष इन्स्टिट्यूट व रिसर्च सेंटर व्यसनमुक्ती केंद्र इंटिग्रेटिव्हर्स फोरम हेमाद्री आयुर्वेद फार्मसी, लाईफ लाईन वेल्फेअर सोसायटी व आयुष नशा मुक्त भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली येथे भव्य संमेलन व नशा मुक्त नॅशनल अवार्ड 2024 चा सन्मान सोहळा नवी दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशन कन्वेंशन सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सच्चिदानंद बांगर यांना नशामुक्त नॅशनल अवार्डने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री खासदार रामदास आठवले हे होते तर प्रमुख उपस्थिती आयुष्यमान भारत गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र एच ई बसेम एफ हेलिस कौन्सेलर एमबॉसी ऑफ द स्टेट पॅलेस्टीन अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे खासदार ओमराजे निंबाळकर , खासदार राजेंद्र वाजे,प्रतापराव जाधव यांची होती.
नशामुक्ती साठी कार्य करणारे देशातील विविध एनजीओ आणि संस्थेचे पदाधिकारी ,अधिकारी यांना नशा मुक्त नॅशनल अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले. त्यामध्ये समाज कल्याण विभाग जि प सोलापूर विभागात कार्यरत असणारे सच्चिदानंद बांगर हे स्वतःची नोकरी सांभाळून सामाजिक कार्याची आवड असल्याने जिल्हा परिषदेमध्ये कर्मचारी तसेच आरोग्य विभागाचे गटप्रवर्तक यांच्यासाठी नशा मुक्तीच्या कार्यशाळा घेतल्या व व्यसनमुक्त होऊ असलेल्या लोकांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवून व्यक्तींना व्यसनमुक्त केल्याबद्दल हे अवार्ड देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे मुख्य प्रवर्तक डॉक्टर संदीप तांबारे यांनी नशा मुक्त भारत अभियान राबविण्यासाठी करावयाच्या अत्यावश्यक गोष्टींमध्ये ड्रग्स दारू गांजा अफीम इत्यादी नशेच्या पदार्थापासून लांब राहणं व समाजाला यापासून दूर ठेवणे ही आपणा सर्वांची मोठी कसोटी आहे हे सांगतानाच आतापर्यंत तीस हजार लोकांना नशा मुक्त केल्याचे डॉक्टर संदीप तांबारे यांनी सांगितले. डॉक्टर ओम प्रकाश शेटे यांनी तंबाखूमुळे कितीतरी लोकांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागत आहे . त्यांनी आपल्या कुटुंबाचा विचार करून तंबाखू सोडावी असे आवाहन केले. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी योग हे भारताचे सर्व जगाला मिळालेली मोठी देणगी होय हे नमूद करत असताना योगासनांचा सराव करून मनावर ताबा मिळवणे व नशा पासून लांब राहून शरीर तंदुरुस्त ठेवण्याचे नुस्खे सांगितले. खासदार वाजे यांनीही व्यसनापासून लांब राहण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी नशा मुक्तीवर यमक जुळवत शीघ्र कविता करून सर्व उपस्थितांचे मने जिंकली व नशामुक्ती साठी काम करणाऱ्या सर्वांचे कौतुक करून हे कार्य यापुढे असेच सुरू ठेवण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे संयोजन डॉक्टर संदीप तांबारे व जुही सब्रवाल दिल्ली यांनी केले होते या कार्यक्रमांमध्ये देशातील विविध मान्यवर एनजीओ संस्थेचे पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.