ताज्या घडामोडी
कळंब येथे अहिल्यादेवी प्रबोधन मंचच्या वतीने गुणवंतांचा सत्कार

तेरणा काठ वृत्तसेवा ––
कळंब:- अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच च्या वतीने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पात्र झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी वैष्णवी प्रदीप यादव, यशराज परमेश्वर वाघमोडे, रणवीर राजेंद्र पवार, अक्षय बजरंग गिरी, अक्षरा वैभव तोडकर आणि शौर्य महेंद्र रणदिवे यांना डॉ रामकृष्ण लोंढे यांच्या हस्ते व डॉ सत्यप्रेम वारे, डॉ अशोक शिंपले , अजित गायके, घाटुळे, वाघमोडे सर, मंगल पसारे, प्रदीप यादव, संभाजी कोळी यांचे उपस्थिती होती ..
यावेळी उपस्थितांनी सर्व गुणवंतांचे , त्यांच्या पालकांचे आणि त्यांना उत्तम मार्गदर्शन करणारे गुरूंचे अभिष्टचिंतन करून पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.