ताज्या घडामोडी

हळदीचा संबंध नसतानाही भावीक हळद का खेळतात ?

तेरणा काठ वृत्तसेवा —
श्री येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा लाखोंच्या संख्येने भाविक या यादीला येतात प्रशासनावर मोठ्या प्रमाणात ताण असला तरी यात्रा महोत्सव व्यवस्थितपणे पूर्णत्वाकडे जातो. मात्र यामध्ये गेल्या काही वर्षापासून हळद लावण्याची चुकीची परंपरा पडली आहे
शेतातील सर्व कामे उरकलेली असल्याने शेतकरी निवांत असतो बलुतेदार बलुते गोळा करून निवांत झालेली असतात . निवांत झाल्यने चैत्र महिन्यातील काही दिवस उत्सवाचे असतात आणि या उत्सवाच्या दिवसातच श्री येडेश्वरी देवीची यात्रा ही एक सर्वसामान्यांसाठी, 18 पगडजातीसाठी आनंदाची पर्वणी असते. या यात्रेत हौसे ,नवशे व गवशे अशा सर्व प्रकारचे भाविक येतात सर्व सामान्याचा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने या यात्रेला गोरगरिबांची यात्रा आणि उघड्यावरची यात्रा म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तसं पाहिलं तर पूर्वीपासून देवी यात्रा महोत्सवात हळद लावण्याचा कसलाही रिवाज नाही किंवा पूर्वपरंपरा नाही परंतु नेमकं भाविकांना कोणी काही सांगितले आणि भाविक मोठ्या प्रमाणात हळद खेळू लागले याबाबत देवस्थान ट्रस्ट कडून वारंवार हळद खेळू नये किंवा एकमेकास लावू नये असे आव्हान करण्यात येत असले तरी भाविक मात्र हळद खेळताना दिसतात सध्या मिळणारी हळद ही नैसर्गिक नसल्याने या हळदीने भाविकांच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम झाल्याचे दिसून आले आहे तरीही भाविक हळद खेळतात तर ती हळद खेळू नये असे आव्हान पुन्हा पुन्हा देवस्थान ट्रस्ट करून करण्यात येत आहे

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.