येरमाळा येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी आजी-माजी सैनिक सरसावले

तेरणा काठ वृत्तसेवा
देशाच्या सिमेवरची सेवा संपल्यानंतर सामाजिक बांधिलकी जपत येडेश्वरी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांना सोबत घेऊन आजी माजी सैनिकांनी 10 वी च्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे मानसिक बळ वाढावे यासाठी गुणगौरव समारंभ आयोजित केला.
या गुणगौरव सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मेजर अनिल पवार होते.माजी सभापती विकास बारकुल, उपसरपंच गणेश बारकुल, संस्था निबंधक कुमार बारकुल, विनोद गादेकर, डॉ.गळवे सर, मुख्याध्यापक एस.एल.पौळ, जनहित परीवाराचे अध्यक्ष संतोष तौर, माजी जिप सदस्य मदन बारकुल,मेजर नागनाथ बारकुल, मेजर अल्लादिन शेख,सुनिल पाटील सर.विभाग प्रमुख राहुल पाटील, समाधान बेदरे,यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी विनोद गादेकर बोलताना म्हणाले की, दहावी ही पहिली पायरी असून आत्ता कुठे आपल्या संघर्षाला सुरुवात झाली आहे त्यासाठी आपण नेहमी तयार असणे महत्त्वाचे आहे आपल्या गावचा वारसा चांगला असून तोच वारसा कायम ठेवण्याची जबाबदारी आपली आहे.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेजर मनोज बारकुल, लिंबराज कोकाटे, युवराज शिंदे, संजय बारकुल, रशीद शेख, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक येडेश्वरी कोचिंग क्लासेसचे अध्यक्ष संतोष आगलावे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीपाद पांगरकर यांनी केले तर शेवटी आभार समाधान बेद्रे यांनी मानले.