ताज्या घडामोडी

येरमाळा ग्रामपंचायतीच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

तेरणा काठ वृत्तसेवा —
कळंब तालुक्यातील येरमाळा ग्रामपंचायतच्या वतीने  दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव  सत्कार समारंभात करण्यात आला. .
दि. १६ शुक्रवार रोजी ग्रामपंचायत कार्यालयाच्या  प्रांगनात दहावी व बारावीच्या परीक्षेत ९० टक्केच्या पुढील गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला . या कार्यक्रमाच्पा अध्पायक्षस्थानी सरपंच प्रिया बारकुल होत्या तर प्रमुख पाहुणे  म्हणून संभाजीनगरचे तहसिलदार शिवानंद बिडवे, बीडचे तहसिलदार सुहास हजारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव, भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी महेंद्र भोर, माजी सभापती विकास बारकुल, उपसरपंच गणेश बारकुल  उपस्थित होते .
सर्वप्रथम सानवी सुखदेव बारकुल हिचा ९८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला  व अंतरा संतोष जाधव हिचा ९७ टक्के मिळवून व्दितीय क्रमांक मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यानंतर सानवी किरण बारकुल, ऋतुजा बारकुल, प्राची राउत, विभावरी जाधव, श्रेया दिवाणे, सई गायकवाड, स्नेहल पवार, जोया शेख, अनुष्का वसंत बारकुल, अमृता देशमुख, अनुष्का उमेश बारकुल, प्रणाली डांगे, वैभव मोरे या सर्व येरमाळा येथील शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर येरमाळा येथील रहिवाशी असलेल्या पण परगावी शाळेत शिक्षण घेऊन यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला . यामध्ये ऋषी बारकुल, वरद बारसकर, श्रावणी बांगर, अस्मिता बारकुल, गायत्री मैंदर्गीकर, वैष्णवी कागदे, मनस्वी शिनगारे, अक्षता बारकुल, श्रेया बारकुल, श्रेया भालेराव, हर्षदा आगलावे या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला त्यामध्ये राम जिमडे, साव नैनाकुमारी, अनुष्का तोडकर, प्रणाली पेजगुडे, सोहम लवटे, मयुरी पाटील, आसिफा शेख, गौतमी जाधव, संघर्ष जगदाळे, विशाखा बारसकर यांचा सन्मान करण्यात आला .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश बारकुल यांनी तर सूत्रसंचालन अमोल बारकुल यांनी केले. मदन बारकुल यांनी आभार मानले

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.