निजामशाही काळातील आंदोरा गावच्या शाळेचा शताब्दी महोत्सव साजरा
७५ आजी-माजी शिक्षकांचा गौरव

शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी दिली शाळेला ११८ वस्तुची भेट……,………
कळंब – आंदोरा येथील जिल्हापरिषद केंद्रिय विद्यामंदीर शाळेला जुन २०२३ मध्ये १०० वर्ष पुर्ण झाल्याबद्दल शाळेतील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेचा शताब्दी महोत्सव मंगळवार दि.१४ रोजी शाळेच्या मैदानात उत्साहाने साजरा करण्यात आला.
आंदोरा गावचे सरपंच तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बळवंत तांबारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कौश्यल्य विकास मंत्रालय मुंबई चे सहाय्यक आयुक्त संतोष राऊत,जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डाँ.दयानंद जटनुरे, तहसिलदार राजाभाऊ कदम माजी सरपंच अशोक तांबारे, चेअरमन माणिक कवडे, शिक्षण विस्तार अधिकारी सुशिल फुलारी,उपसरपंच दत्तात्रय तांबारे केंद्रप्रमुख सोमनाथ चंदनशिव, शाळा व्यस्थापन समितीचे अध्यक्ष अदिनाथ कवडे कमलाकर तांबारे उपस्थित होते.
आंदोरा येथील जिल्हापरिषद विद्यामंदीर शाळेची स्थापना स्वातंत्र्यपुर्व काळात इ स.१९२३ मध्ये झाली. शतकपुर्ती निमित्तानं दि.१४ रोजी शाळेचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला . सकाळी ८ वाजता गावातून शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत पालखीतून ग्रंथ दिंडी काढण्यात आली यात भजनी मंडळ,लेझीम पथक सहभागी झाले होते विविध वेशभुषा केलेले विद्यार्थी सहभागी झाले होते.
शाळेच्या मैदानात स्वामी विवेकानंद वाचनाय आंदोरा यांच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन ,येडाई व्यसन मुक्ती केंद्र येरमाळा च्या वतीने व्यसनाचे दुष्परिणाम यावर प्रदर्शन तर कृष्णा हाँस्पिटल कळंब च्या वतीने आरोग्य शिबीराचे आयोजन तर महिला बचत गटाच्यावतीने बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
या वेळी सहाय्यक आयुक्त संतोष राऊत म्हणाले की ग्रामिण भागातील जिल्हापरिषदेच्या शाळेतील गुणवत्ता इतर खाजगी शाळेपेक्षा निश्चितच चांगली आहे . मी जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा पाहील्या आहेत त्यातून मला पहावयास मिळाले आहे.
जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डाँ.दयानंद जटनुरे म्हणाले की शताब्दी महोत्सव साजरी करणारी ही शाळा मी प्रथमच पहात आहे. आंदोरा शाळेसाठी डायट मार्फत विविध योजना राबवण्यात येणार आहेत. सरपंच बळवत तांबारे म्हणाले की शाळेच्या भौतिक गरजा पुर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत च्यावतीने पाच लाख पन्नास हजाराची तरतुद करण्यात आली असुन भविष्यात शाळेला कसलीही कमतरता पडु दिली जाणार नाही.वेळप्रसंगी शाळेसाठी जवळची रक्कम खर्च करण्याची तयारी दर्शवली. माजी विद्यार्थी म्हणून देगलूरचे तहसिलदार राजाभाऊ कदम यांनी पुर्वीचे शिक्षक तन व मनाने शाळेत काम करायचे पण काळाचा महिमा बदलला आज कांही शिक्षक शरीराने शाळेत असतात पण मनाने इतरत्र असतात म्हणून शिक्षक व विद्यार्थी यांचे अंतर वाढत चालले आहे ते कमी होणे गरजेचे आहे.तर डाँ.संदिप तांबारे यांनी आपल्या रांगड्या भाषेत शिक्षणाचे महत्व व शाळेतील अनुभव कथन केले.
यावेळी शिक्षकातून अमोल बाभळे तर महिला प्रतिनीधी म्हणून सुरेखा तांबारे यांनी विचार मांडले.तर शाळेतील विद्यार्थीनींनी स्वागत गीत,टीपरीनृत्य सादर केले.
सोहळा यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय कोळी,मदन तांबारे, अशोक शिंदे,रविकांत तांबारे,सचिन कवडे, दादासाहेब कदमा,झुंबर बाराते, हनुमंत तामाने,अंकुश डीगे, , अजित पाटील,हनुमंत तांबारे सतिश कवडे, बालाजी शिंदे, सुजित पाटील,प्रदिप लोंढे यांनी परिश्रम घेतले.
प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी आपल्या प्रास्ताविकातून शाळेचा पुर्वइतिहा व शताब्दी सोहळ्याचा हेतू विशद केला कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीकांत तांबारे ,श्रीम.विद्या वैद्य व डाँ.रेवती घाडगे यांनी तर आभार मदन तांबारे यांनी मानले.
*आंदोरा गावात सेवा दिलेल्या आजी माजी ७५शिक्षकांचा गौरव*
फुलचंद घोडके, धनाजी पाटील, प्रभाकर कुलकर्णी , तुपसुंदरे, श्रीधर पवार, शंकर शेटे, दत्तात्रय भांगे,रमेश बुबणे,श्रीम.प्रतिभा बावीकर,रामकृष्ण शिंदे, भारत भालेकर,चंद्रकांत भोसले, श्रीम.जयश्री गिरी, भगवान वाघमारे, श्रीमती कौश्यल्या काकडे, शत्रुघ्न कावळे, आरसोलीकर, श्रीम.कमल चव्हाण, विष्णूपंत बारकुल,श्रीम.लता पुकले, विजयराज काळे, शंकर तामाने,श्रीम.पायल राठोड,अमोल बाभळे, दिपक चाळक, श्रीम.अंजली यादव, श्रीम.सविता दारसेवाड, श्रीम.अनिता ढेपे,श्रीम,ज्योती ढेपे, रामेश्वर जगदाळे, संघरत्न कसबे, परशुराम कठारे,श्रीम.लक्ष्मी कोकाटे,श्रीम.ज्योत्सना मैंदाड,श्रीम.चंद्रकला कुटे, श्रीम.इंदुमती वाघमारे, श्रीम.ताई मोरे, श्रीम.मैनाबाई मुळे,प्रशांत निन्हाळ, श्रीम.पुष्पा बुरकुले, श्रीम.ज्योती गुरव,श्रीम.प्रणिता सावरगावकर विठ्ठल सांमते, रामहरी शेंडगे, श्रीराम सुर्यवंशी,श्रीम.ज्योत्सना तांबारे ,श्रीम.शुभांगी तांबारे ,संतोष ठोंबरे,श्रीम.अंजली भालेकर, श्रीम.सुनंदा चव्हाण, श्रीम.लता पवार,श्रीम.सविता मेटे, श्रीम.सुरेखा चोभारकर, श्रीम.रंजना थोरात, श्रीमती वृषाली तांबे, श्रीम,वंदना मेंडके, श्रीम.मंजुषा भालेकर,बिभिषण जगताप,कीशोर मुंढे,श्रीम.सुवर्णा पाटील, संजय वाघमारे,श्रीम.सिंधू तांबारे -तावरे ,श्रीकांत तांबारे , श्रीमती तेजश्री माडवाडकर -तांबारे ,राम शिंदे, श्रीम.राजाबाई देशमुख ,श्रीम.सुरेखा साळी, श्रीम.सुवर्णमाला तवले, श्रीम.राज्यकन्या तोडकर,गफुर पठाण,नागेश टोणगे ,दत्तात्रय ढोले,मनोज कदम,कालिदास वणवे,श्रीम.विद्या तांबारे-वैद्य तर पशुवैद्यकीय अधिकारी पदावर निवड झाल्याबद्दल कु.स्नेहा जगदाळे हीचा पण सत्कार करण्यात आला.
*माजी विद्यार्थ्यांकडुन शाळेला नित्यउपयोगी ११८वस्तु व ६७६३ पुस्तकांची देणगी*
खुर्ची नग १० नग,स्पिकर सेट,पुस्तके ६७६३ , मीटर टेप ,खोर,टीकाव,पहार , टोपले २ नग, समई ,एल.ई.डी.२ नग , मँट १२ नग, कुकर , कपाट , पाणी जार १० नग,बकेट ३ नग,ग्लास २४ नग जग १० नग,स्टील पाट्या ६ नग, CCTV ८ कँमेरे , फँन १४ नग, डस्टबिन ७ नग, भांडी रँक,
धाराशिव जिल्हापरिषदेची शतक महोत्सव साजरा करणारी जिल्ह्यातील जिल्हापरिषद विद्यामंदिर आंदोरा ही पहिली शाळा आहे. या शताब्दी महोत्सवामुळे ३०-४० वर्षानंतर गाठीभेटी झाल्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ९३ वर्ष वय असलेले येडबा कवडे हे विद्यार्थी व ९० वर्ष वय झालेल्या शिक्षिका श्रीमती प्रतिभा बावीकर या शताब्दी महोत्सवात उपस्थित होते.तर शंकर शेट्ये गुरुजीनी २५ वर्षानंतर पुन्हा चौथीचा इतिहासाचा तास घेतला सकाळी ८ पासून सायंकाळी ५ पर्यंत हा कार्यक्रम चालू होता . तर जेवनासाठी दही,धपाटे,ठेचा व शेंगाच्या चटणीचा अस्सल ग्रामिण बेत अखला होता. शेवट पर्यंत गप्पा चालू च होत्या शेवटी जड अंतकरणाने सर्वांनी निरोप घेतला.